बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे
भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.
काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले याची माहिती द्यावी.मग यांच्यावर ही कायदेशीर गुन्हे दाखल करावे.जर याचे समाधानकारक उत्तर जर पोलीस प्रशासनाकडे उपलब्ध नसेल तर भीम सैनिकांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे.कारण आपल्या या अशा वागण्याने भारतीय घटनेतील स्वातंत्र्य,समता या संवैधानिक मूल्याला ठेस पोहचत आहे.येत्या 24 तासात भीम सैनिकांवर दाखल केलेली खोटी गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे.अशी मागणी इंडियन पँथर सेना प्रमुख संविधान दुगाने यांनी केली आहे.
जर गुन्हे माघार घेतली नाही तर बेमूदत आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा