जास्त नफा मिळवण्यासाठी सीताफळ प्रक्रिया करणे गरजेचे - सौ. श्रद्धा रोहित देशमुख संचालिका विभागीय सीताफळ कार्यशाळेत सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाचा सहभाग बिलोली प्रतिनिधी औरंगाबाद येथील तापडिया नाट्यगृह येथे दि. ३० ऑक्टोबर २०१७ रोजी, पहिली “विभागीय सीताफळ कार्यशाळा” महाराष्ट्र शासन व चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी यशस्वी प्रक्रिया महिला उद्योजक म्हणून संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी येथील उत्कर्ष अॅग्रो इंडस्ट्रीज आणि ट्रेनिंग सेन्टरच्या संचालिका सौ. श्रद्धा रोहित देशमुख यांना आमंत्रित केले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन मा. डॉ. पुरुषोत्तम भापकर, विभागीय आयुक्त, औरंगाबाद आणि श्री नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी सौ. श्रद्धा रोहित देशमुख यांनी त्यांच्या उत्कर्ष अॅग्रो इंडस्ट्रीज आणि ट्रेनिंग सेन्टरची स्थापना व वाटचाल याबद्दल सविस्तर अनुभव सांगितले तसेच प्रक्रिया उद्योगातील त्यांचे अनुभव कथन केले. सध्याच्या काळात जास्त नफा मिळवण्यासाठी सीताफळ प्रक्रिया करणे
वैभव माधवराव घाटे मुख्य संपादक बिलोली टाईम्स न्युज कार्यालय पत्ता गांधीनगर बिलोली मो. 7972118734