मुख्य सामग्रीवर वगळा

भविष्यात अपघाताचे माहेरघर बनेल बिलोली देगलूर महामार्ग-संविधान दुगाने



🚦भविष्यात अपघाताचे माहेरघर बनेल बिलोली देगलूर महामार्ग-संविधान दुगाने 

       नांदेड प्रतिनिधी
आंध्र,तेलंगणा व कर्नाटक राज्यांना जोडणारा हा रस्ता भविष्यात म्रुत्यूचा सापळा बनेल.अस वक्तव्य ट्वीटर या सोशल मीडियावर वारणेचा वाघ सामाजिक संघटनेच्या संविधान दुगाने यांनी केल आहे.
 श्री.विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून बिलोली ते आदमपूर या दरम्यान 16 किमी रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम चालू आहे मात्र हे काम इस्टिमेन्ट नुसार ठरवून दिलेल्या निकषांनुसार होतय का हे पहाण्यासाठी कुठल्याही राजकीय,अराजकिय पुढारी लोकांना व शासकीय बांधकाम अभियंत्याला वेळ नाही हे मात्र निश्चित.कारण ह्या रस्त्यावर दोन वर्षाच्या आत मोठ-मोठे खड्डे पडतील का तर या कामात मुरुमा ऐवजी काळी माती व लाल मातीचा वापर तर गिट्टि सुद्धा धूळरहित वापरली गेली आहे.आणि धूळ रहित गिट्टिचा वापर केल्याने रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता हे समजने मात्र कठिन जाणार आहे.
    दूसरी महत्वपूर्ण बाब म्हणजे या रस्त्यात येणारे जे पूल आहेत ते सीमेंट कॉन्क्रेटचे बांधण्या ऐवजी यात मोठ मोठ्या दगडांचा सर्रास वापर केला गेला आहे.पाण्याच्या ओघाणे जर ही पुलं वाहून गेली तर भविष्यात खूप मोठी जीवित हानि होऊ शकते ही हानि टाळण्यासाठी रस्ता व पूल मजबूत बनवणे काळाची गरज आहे अस मत दुगाने नी व्यक्त केल आहे.
     रस्त्याच्या या गंभीर समस्येसाठी वारणेचा वाघ ही सामाजिक संघटना नांदेड जिल्ह्यात जागरूक असून कंत्राटदाराची मनमानी इथे खपवून घेतली जाणार नाही.बांधण्यात आलेली सर्व निकृष्ट पूल पाडून ते नव्याने बांधण्यात यावेत,पूर्वी अद्यावत असलेला रस्ता पूर्ण उकरून मजबूत बनवण्यात यावा.जागोजागी सावधान काम प्रगतीपथावर आहे.अशा पद्धतीच्या प्रवाशांना सावध करणाऱ्या पाट्या लावण्यात यावेत.जेणेकरून अपघात होनार नाहीत.उर्वरित काम शासकीय अभियंता व समितीच्या देखरेखीखाली निकषांनुसार पूर्ण करण्यात यावे.या मागणीसाठी खूप मोठ जन आंदोलन उभारण्यात येईल अस ही ते म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले

* लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले*   * नांदेड :-  वैभव घाटे*  मेसचे बिल मंजूर करण्यासाठी गृहपाल किशोरी अलोने यांना २० हजाराची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. हदगाव येथील समाज कल्याण विभागाच्या मुलीच्या वसतिगृहात त्या कार्यरत असून याच ठिकाणी त्यांना पकडण्यात आले.     हदगाव येथे समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह आहे. येथे ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनी राहत असून किशोरी अलोने या गृहपाल आहेत. वसतिगृहात कार्यरत असलेल्या खानावळीचे बिल काढताना विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरावी भरावी लागते. हि बाब लक्षात घेऊन अलोने यांनी मेस चालकाची अडवणूक करत विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरण्यासाठी २० हजार रुपयाची मागणी केली. यानंतर मेस चालकाने याबाबत नांदेड एसीबी कडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करत आज सकाळी ११ वाजता नांदेड एसीबी ने शासकीय वसतिगृह परिसरात सापळा रचला. यावेळी अलोने या मेस चालकाकडून २० हजाराची लाच स्वीकारताना एसिबी च्या जाळ्यात अडकल्या.     याप्रकरणात हदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा सापळा पोलीस अधीक्षक संजय ला

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.  बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे  गेल्या अनेक दिवसांपासून बिलोली तहसिल कार्यालयातील कर्मचारी निवासी न राहता नांदेड सारख्या शहरात राहून येजा करीत असल्याने तहसिल कार्यालयाचे अनेक कामे वेळेत होत नसल्यामुळे जनतेची कामे खोळंबत असल्याने पत्रकार  संरक्षण समिती  बिलोली च्या वतिने विभागीय अधिकारी बिलोली यांना निवेदन देण्यात आले. बिलोली तहसिल कार्यालयाचे तहसिलदार विनोद गुंडमवार हे बिलोली तहसिल येथे रुजू झाल्यापासून आजतागायत तहसील कार्यालयात नांदेड येथून ये-जा करीत आहेत. याचेच अनुकरण नायब तहसीलदार हे देखील नांदेड येथून ये-जा करित असुन मुख्यालया राहत नसूनही शासनाकडून घरभाडे उचल करीत शासनाची दिशाभूल करीत आहेत याचाच अर्थ उंटावरुन शेळ्या हाकण्यासारखा कारभार सदरील तहसील कर्मच्यार्यांचा झाला आहे. यामुळे तालुक्यातील निराधार, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व बिलोली तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग उद्भवल्यास याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न तहसिलदार ये-जा करीत आसल्या कारणांमुळे अनेक कामे खोळंबत असल्याने जनतेची गैरसोय होत आहे.  बिलोली तालुक्यातील जनतेची गैरसोय दुर क

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध -------------------------------------------------------------  बिलोली     हिंगोली जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला.या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ ता.बिलोलीच्या वतीने जाहिर निषेध करून हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीचे निवेदन तहसिलदार बिलोली यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडे पाठवले आले.    हिंगोलीचे जेष्ठ पञकार व जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर दि.२३ आक्टोंबर रोजी अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक केला.हि घटना घडून ३ दिवस उलटले तरी पोलिसांना आरोपीस पकडण्यात अध्याप अश आले नाही.यामुळे तालुक्यातील पञकारांमध्ये संतापाची लाठ उसळली असून दिलेल्या निवेदनात आपल्या भावना प्रकट करून मा.मुख्यमंञी यांच्याकडे नायब तहसिलदार संजय नागमवाड यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.यावेळी पञकार संघाचे अध्यक्ष  राजेंद्र पा.शिंदे,संघाचे प्रमुख गोविंद मुंडकर,कार्याध्यक्ष बाबूराव इंगळे,उपाध्यक्ष