🚦भविष्यात अपघाताचे माहेरघर बनेल बिलोली देगलूर महामार्ग-संविधान दुगाने
नांदेड प्रतिनिधी
आंध्र,तेलंगणा व कर्नाटक राज्यांना जोडणारा हा रस्ता भविष्यात म्रुत्यूचा सापळा बनेल.अस वक्तव्य ट्वीटर या सोशल मीडियावर वारणेचा वाघ सामाजिक संघटनेच्या संविधान दुगाने यांनी केल आहे.
श्री.विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून बिलोली ते आदमपूर या दरम्यान 16 किमी रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम चालू आहे मात्र हे काम इस्टिमेन्ट नुसार ठरवून दिलेल्या निकषांनुसार होतय का हे पहाण्यासाठी कुठल्याही राजकीय,अराजकिय पुढारी लोकांना व शासकीय बांधकाम अभियंत्याला वेळ नाही हे मात्र निश्चित.कारण ह्या रस्त्यावर दोन वर्षाच्या आत मोठ-मोठे खड्डे पडतील का तर या कामात मुरुमा ऐवजी काळी माती व लाल मातीचा वापर तर गिट्टि सुद्धा धूळरहित वापरली गेली आहे.आणि धूळ रहित गिट्टिचा वापर केल्याने रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता हे समजने मात्र कठिन जाणार आहे.
दूसरी महत्वपूर्ण बाब म्हणजे या रस्त्यात येणारे जे पूल आहेत ते सीमेंट कॉन्क्रेटचे बांधण्या ऐवजी यात मोठ मोठ्या दगडांचा सर्रास वापर केला गेला आहे.पाण्याच्या ओघाणे जर ही पुलं वाहून गेली तर भविष्यात खूप मोठी जीवित हानि होऊ शकते ही हानि टाळण्यासाठी रस्ता व पूल मजबूत बनवणे काळाची गरज आहे अस मत दुगाने नी व्यक्त केल आहे.
रस्त्याच्या या गंभीर समस्येसाठी वारणेचा वाघ ही सामाजिक संघटना नांदेड जिल्ह्यात जागरूक असून कंत्राटदाराची मनमानी इथे खपवून घेतली जाणार नाही.बांधण्यात आलेली सर्व निकृष्ट पूल पाडून ते नव्याने बांधण्यात यावेत,पूर्वी अद्यावत असलेला रस्ता पूर्ण उकरून मजबूत बनवण्यात यावा.जागोजागी सावधान काम प्रगतीपथावर आहे.अशा पद्धतीच्या प्रवाशांना सावध करणाऱ्या पाट्या लावण्यात यावेत.जेणेकरून अपघात होनार नाहीत.उर्वरित काम शासकीय अभियंता व समितीच्या देखरेखीखाली निकषांनुसार पूर्ण करण्यात यावे.या मागणीसाठी खूप मोठ जन आंदोलन उभारण्यात येईल अस ही ते म्हणाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा