बिलोलीचे एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालय वा-यावर
बिलोली - वैभव घाटे
येथील एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालय निव्वळ शोभेचे वस्तू बनले आहे.येथे केवळ एका चतुर्थ श्रेणी कर्मचा-यावर कार्यालयाचे काम सुरू आहे.तालुक्यातील १५ हजार बालक बालिकांसाठी १८५ अंगणवाडी कर्मचारी आणि कामकाज सध्या वा-यावर आहे.एकही अधिकारी वा कार्यप्रणव कर्मचा-याशिवाय या विभागाचे कामकाज सुरू आहे.
बिलोली येथील एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालय निव्वळ नावालाच कार्यरत आहे.या महत्वपुर्ण कार्यालयाकडे एकाही अधिकारी वा पदाधिकारी यांचे लक्ष असल्याचे दिसून येत नाही.बालक आणि बालिका सदृढ आणि सक्षम घडविण्यासाठी भावी भारत मजबूत बनविण्यासाठी कार्यरत असलेला हा विभाग सध्या उपेक्षित आहे.
या कार्यालयाचे एकात्मीक बाल विकास प्रकल्प अधिकारी पद रिक्त आहे.हे पद एका प्रामाणिक पण आजारग्रस्त व्यक्तीला अतिरिक्तपणे देण्यात आला.धर्माबाद येथून ये - जा करणाऱ्या बजाज नामक साह्यक गट विकास अधिका-यास येथील प्रमुख पद देवून आजारग्रस्त कार्यालयाला मरणासन्न करण्यात आले आहे.
सुगंधा क-हाळे या विस्तार अधिकारी सुद्धा देगलूरच्या मुळ काम पाहत नावाला बिलोलीचा पदभार घेऊन आहेत.हिच अवस्था कर्तव्यनिष्ठ कनिष्ठ सहाय्यक श्री.नरंगलकर यांचीही आहे.शिवाय ७ सुपरवायझर पैकी केवळ ६ सुपरवायझर कार्यरत आहेत.ते आपल्या सोई सुविधा आणि इच्छेप्रमाणे काम करताना दिसून येत आहेत.एक सेवक अर्थात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यावर कार्यालयाचा भार आहे.याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिंगने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल स्वीच आँफ होता.
एकंदरीत १५००० बालक बालिकांचे भवितव्य अंधारात लोटणा-या जिल्हा परिषद प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
१८५ अंगणवाडी सेविका व कर्मचारी तसेच ६ सुपरवायझर आपल्या सोई सुविधा व इच्छेनुसार काम करताना दिसून येत आहेत.तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून वसूली कोणती व कोणी केली ?कोणाला देण्यासाठी केली ? व कोणाला दिली ? याची तालुक्यात चविष्ठ चर्चा आहे.
बिलोली - वैभव घाटे
येथील एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालय निव्वळ शोभेचे वस्तू बनले आहे.येथे केवळ एका चतुर्थ श्रेणी कर्मचा-यावर कार्यालयाचे काम सुरू आहे.तालुक्यातील १५ हजार बालक बालिकांसाठी १८५ अंगणवाडी कर्मचारी आणि कामकाज सध्या वा-यावर आहे.एकही अधिकारी वा कार्यप्रणव कर्मचा-याशिवाय या विभागाचे कामकाज सुरू आहे.
बिलोली येथील एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालय निव्वळ नावालाच कार्यरत आहे.या महत्वपुर्ण कार्यालयाकडे एकाही अधिकारी वा पदाधिकारी यांचे लक्ष असल्याचे दिसून येत नाही.बालक आणि बालिका सदृढ आणि सक्षम घडविण्यासाठी भावी भारत मजबूत बनविण्यासाठी कार्यरत असलेला हा विभाग सध्या उपेक्षित आहे.
या कार्यालयाचे एकात्मीक बाल विकास प्रकल्प अधिकारी पद रिक्त आहे.हे पद एका प्रामाणिक पण आजारग्रस्त व्यक्तीला अतिरिक्तपणे देण्यात आला.धर्माबाद येथून ये - जा करणाऱ्या बजाज नामक साह्यक गट विकास अधिका-यास येथील प्रमुख पद देवून आजारग्रस्त कार्यालयाला मरणासन्न करण्यात आले आहे.
सुगंधा क-हाळे या विस्तार अधिकारी सुद्धा देगलूरच्या मुळ काम पाहत नावाला बिलोलीचा पदभार घेऊन आहेत.हिच अवस्था कर्तव्यनिष्ठ कनिष्ठ सहाय्यक श्री.नरंगलकर यांचीही आहे.शिवाय ७ सुपरवायझर पैकी केवळ ६ सुपरवायझर कार्यरत आहेत.ते आपल्या सोई सुविधा आणि इच्छेप्रमाणे काम करताना दिसून येत आहेत.एक सेवक अर्थात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यावर कार्यालयाचा भार आहे.याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिंगने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल स्वीच आँफ होता.
एकंदरीत १५००० बालक बालिकांचे भवितव्य अंधारात लोटणा-या जिल्हा परिषद प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
१८५ अंगणवाडी सेविका व कर्मचारी तसेच ६ सुपरवायझर आपल्या सोई सुविधा व इच्छेनुसार काम करताना दिसून येत आहेत.तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून वसूली कोणती व कोणी केली ?कोणाला देण्यासाठी केली ? व कोणाला दिली ? याची तालुक्यात चविष्ठ चर्चा आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा