मुख्य सामग्रीवर वगळा
बिलोलीचे एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालय वा-यावर 

 बिलोली - वैभव घाटे 

      येथील एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालय निव्वळ शोभेचे वस्तू बनले आहे.येथे केवळ एका चतुर्थ श्रेणी कर्मचा-यावर कार्यालयाचे काम सुरू आहे.तालुक्यातील १५ हजार बालक बालिकांसाठी १८५ अंगणवाडी कर्मचारी आणि कामकाज सध्या वा-यावर आहे.एकही अधिकारी वा कार्यप्रणव कर्मचा-याशिवाय या विभागाचे कामकाज सुरू आहे.
   बिलोली येथील एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालय निव्वळ नावालाच कार्यरत आहे.या महत्वपुर्ण कार्यालयाकडे एकाही अधिकारी वा पदाधिकारी यांचे लक्ष असल्याचे दिसून येत नाही.बालक आणि बालिका सदृढ आणि सक्षम घडविण्यासाठी भावी भारत मजबूत बनविण्यासाठी कार्यरत असलेला हा विभाग सध्या उपेक्षित आहे.
    या कार्यालयाचे एकात्मीक बाल विकास प्रकल्प अधिकारी पद रिक्त आहे.हे पद एका प्रामाणिक पण आजारग्रस्त व्यक्तीला अतिरिक्तपणे देण्यात आला.धर्माबाद येथून ये - जा करणाऱ्या बजाज नामक साह्यक गट विकास अधिका-यास येथील प्रमुख पद देवून आजारग्रस्त कार्यालयाला मरणासन्न करण्यात आले आहे.
   सुगंधा क-हाळे या विस्तार अधिकारी सुद्धा देगलूरच्या मुळ काम पाहत नावाला बिलोलीचा पदभार घेऊन आहेत.हिच अवस्था कर्तव्यनिष्ठ कनिष्ठ सहाय्यक श्री.नरंगलकर यांचीही आहे.शिवाय ७ सुपरवायझर पैकी केवळ ६ सुपरवायझर कार्यरत आहेत.ते आपल्या सोई सुविधा आणि इच्छेप्रमाणे काम करताना दिसून येत आहेत.एक सेवक अर्थात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यावर कार्यालयाचा भार आहे.याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिंगने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल स्वीच आँफ होता.
  एकंदरीत १५००० बालक बालिकांचे भवितव्य  अंधारात लोटणा-या जिल्हा परिषद प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
१८५ अंगणवाडी सेविका व कर्मचारी तसेच ६ सुपरवायझर आपल्या सोई सुविधा व इच्छेनुसार काम करताना दिसून येत आहेत.तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून वसूली कोणती व कोणी केली ?कोणाला देण्यासाठी केली ? व कोणाला दिली ? याची तालुक्यात चविष्ठ चर्चा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले

* लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले*   * नांदेड :-  वैभव घाटे*  मेसचे बिल मंजूर करण्यासाठी गृहपाल किशोरी अलोने यांना २० हजाराची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. हदगाव येथील समाज कल्याण विभागाच्या मुलीच्या वसतिगृहात त्या कार्यरत असून याच ठिकाणी त्यांना पकडण्यात आले.     हदगाव येथे समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह आहे. येथे ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनी राहत असून किशोरी अलोने या गृहपाल आहेत. वसतिगृहात कार्यरत असलेल्या खानावळीचे बिल काढताना विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरावी भरावी लागते. हि बाब लक्षात घेऊन अलोने यांनी मेस चालकाची अडवणूक करत विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरण्यासाठी २० हजार रुपयाची मागणी केली. यानंतर मेस चालकाने याबाबत नांदेड एसीबी कडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करत आज सकाळी ११ वाजता नांदेड एसीबी ने शासकीय वसतिगृह परिसरात सापळा रचला. यावेळी अलोने या मेस चालकाकडून २० हजाराची लाच स्वीकारताना एसिबी च्या जाळ्यात अडकल्या.     याप्रकरणात हदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा सापळा पोलीस अधीक्षक संजय ला

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.  बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे  गेल्या अनेक दिवसांपासून बिलोली तहसिल कार्यालयातील कर्मचारी निवासी न राहता नांदेड सारख्या शहरात राहून येजा करीत असल्याने तहसिल कार्यालयाचे अनेक कामे वेळेत होत नसल्यामुळे जनतेची कामे खोळंबत असल्याने पत्रकार  संरक्षण समिती  बिलोली च्या वतिने विभागीय अधिकारी बिलोली यांना निवेदन देण्यात आले. बिलोली तहसिल कार्यालयाचे तहसिलदार विनोद गुंडमवार हे बिलोली तहसिल येथे रुजू झाल्यापासून आजतागायत तहसील कार्यालयात नांदेड येथून ये-जा करीत आहेत. याचेच अनुकरण नायब तहसीलदार हे देखील नांदेड येथून ये-जा करित असुन मुख्यालया राहत नसूनही शासनाकडून घरभाडे उचल करीत शासनाची दिशाभूल करीत आहेत याचाच अर्थ उंटावरुन शेळ्या हाकण्यासारखा कारभार सदरील तहसील कर्मच्यार्यांचा झाला आहे. यामुळे तालुक्यातील निराधार, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व बिलोली तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग उद्भवल्यास याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न तहसिलदार ये-जा करीत आसल्या कारणांमुळे अनेक कामे खोळंबत असल्याने जनतेची गैरसोय होत आहे.  बिलोली तालुक्यातील जनतेची गैरसोय दुर क

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध -------------------------------------------------------------  बिलोली     हिंगोली जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला.या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ ता.बिलोलीच्या वतीने जाहिर निषेध करून हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीचे निवेदन तहसिलदार बिलोली यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडे पाठवले आले.    हिंगोलीचे जेष्ठ पञकार व जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर दि.२३ आक्टोंबर रोजी अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक केला.हि घटना घडून ३ दिवस उलटले तरी पोलिसांना आरोपीस पकडण्यात अध्याप अश आले नाही.यामुळे तालुक्यातील पञकारांमध्ये संतापाची लाठ उसळली असून दिलेल्या निवेदनात आपल्या भावना प्रकट करून मा.मुख्यमंञी यांच्याकडे नायब तहसिलदार संजय नागमवाड यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.यावेळी पञकार संघाचे अध्यक्ष  राजेंद्र पा.शिंदे,संघाचे प्रमुख गोविंद मुंडकर,कार्याध्यक्ष बाबूराव इंगळे,उपाध्यक्ष