जास्त नफा मिळवण्यासाठी सीताफळ प्रक्रिया करणे गरजेचे - सौ. श्रद्धा रोहित देशमुख संचालिका
विभागीय सीताफळ कार्यशाळेत सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाचा सहभाग
बिलोली प्रतिनिधी
औरंगाबाद येथील तापडिया नाट्यगृह येथे दि. ३० ऑक्टोबर २०१७ रोजी, पहिली “विभागीय सीताफळ कार्यशाळा” महाराष्ट्र शासन व चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी यशस्वी प्रक्रिया महिला उद्योजक म्हणून संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी येथील उत्कर्ष अॅग्रो इंडस्ट्रीज आणि ट्रेनिंग सेन्टरच्या संचालिका सौ. श्रद्धा रोहित देशमुख यांना आमंत्रित केले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन मा. डॉ. पुरुषोत्तम भापकर, विभागीय आयुक्त, औरंगाबाद आणि श्री नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी सौ. श्रद्धा रोहित देशमुख यांनी त्यांच्या उत्कर्ष अॅग्रो इंडस्ट्रीज आणि ट्रेनिंग सेन्टरची स्थापना व वाटचाल याबद्दल सविस्तर अनुभव सांगितले तसेच प्रक्रिया उद्योगातील त्यांचे अनुभव कथन केले. सध्याच्या काळात जास्त नफा मिळवण्यासाठी सीताफळ प्रक्रिया करणे गरजेचे आहे हे देखील उपस्थित शेतकऱ्यांना पटवून सांगितले. या सोबतच प्रा. माधुरी रेवनवार गृह विज्ञान विषयतज्ञ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांनी उत्कर्ष अॅग्रो इंडस्ट्रीजच्या उत्पादनांची माहिती मान्यवरांना तसेच शेतकऱ्यांना प्रदर्शनामध्ये दिली. यामध्ये सीताफळाचा गर आणि त्यापासून तयार केलेला मिल्कशेक विक्रीसाठी ठेवण्यात आला. त्यात शेतकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला.
या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर नमाणे (संचालक सीताफळ संघ, सासवड), डॉ. एम बी पाटील (प्रभारी अधिकारी, फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, औरंगाबाद), श्री नवनाथ कसपटे (अध्यक्ष, आखिल भारतीय सीताफळ संघ), श्री फरसुले (उद्योजक, औरंगाबाद), श्री संजय मोरे (शेतीनिष्ट पुरस्कार प्राप्त शेतकरी) आणि श्री संजय पडवळ (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी औरंगाबाद ) हे व्यासपीठावर उपस्थित होतो.
बिलोली प्रतिनिधी
औरंगाबाद येथील तापडिया नाट्यगृह येथे दि. ३० ऑक्टोबर २०१७ रोजी, पहिली “विभागीय सीताफळ कार्यशाळा” महाराष्ट्र शासन व चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी यशस्वी प्रक्रिया महिला उद्योजक म्हणून संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी येथील उत्कर्ष अॅग्रो इंडस्ट्रीज आणि ट्रेनिंग सेन्टरच्या संचालिका सौ. श्रद्धा रोहित देशमुख यांना आमंत्रित केले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन मा. डॉ. पुरुषोत्तम भापकर, विभागीय आयुक्त, औरंगाबाद आणि श्री नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी सौ. श्रद्धा रोहित देशमुख यांनी त्यांच्या उत्कर्ष अॅग्रो इंडस्ट्रीज आणि ट्रेनिंग सेन्टरची स्थापना व वाटचाल याबद्दल सविस्तर अनुभव सांगितले तसेच प्रक्रिया उद्योगातील त्यांचे अनुभव कथन केले. सध्याच्या काळात जास्त नफा मिळवण्यासाठी सीताफळ प्रक्रिया करणे गरजेचे आहे हे देखील उपस्थित शेतकऱ्यांना पटवून सांगितले. या सोबतच प्रा. माधुरी रेवनवार गृह विज्ञान विषयतज्ञ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांनी उत्कर्ष अॅग्रो इंडस्ट्रीजच्या उत्पादनांची माहिती मान्यवरांना तसेच शेतकऱ्यांना प्रदर्शनामध्ये दिली. यामध्ये सीताफळाचा गर आणि त्यापासून तयार केलेला मिल्कशेक विक्रीसाठी ठेवण्यात आला. त्यात शेतकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला.
या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर नमाणे (संचालक सीताफळ संघ, सासवड), डॉ. एम बी पाटील (प्रभारी अधिकारी, फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, औरंगाबाद), श्री नवनाथ कसपटे (अध्यक्ष, आखिल भारतीय सीताफळ संघ), श्री फरसुले (उद्योजक, औरंगाबाद), श्री संजय मोरे (शेतीनिष्ट पुरस्कार प्राप्त शेतकरी) आणि श्री संजय पडवळ (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी औरंगाबाद ) हे व्यासपीठावर उपस्थित होतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा