मुख्य सामग्रीवर वगळा

बिलोली-देगलूर मार्गावरील लक्ष्मी कन्स्ट्रक्शन चे काम त्वरीत थांबविन्याची मागणी....! 13 नोव्हेंबर पासून बेमूदत आमरण उपोषण.. 🏻बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे


बिलोली-देगलूर मार्गावरील लक्ष्मी कन्स्ट्रक्शन चे काम त्वरीत थांबविन्याची मागणी....!
13 नोव्हेंबर पासून बेमूदत आमरण उपोषण..

🏻बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे

महाराष्ट्र कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या बिलोली देगलूर मार्गावर लक्ष्मी कन्स्ट्रक्शन अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण व पूल बांधणी चे काम 16 किमी अंतरावर बऱ्याच दिवसापासून चालू आहे.पण हे काम एकदम निकृष्ट पद्धतीचे होत असून रस्त्याच्या रुंदीकरनासाठी मुरुमाएवजी काळी मातीचा तसेच डष्टरहित गिट्टिचा वापर मोठ्याप्रमात केला जात आहे.तर पूलाच्या कामासाठी सीमेंट कोन्क्रेट ऐवजी मोठ-मोठ्या दगडांचा वापर करून वर-वरून सीमेंट चा लेप देऊन पुलाचे काम पूर्ण करत असल्याचे निदर्शनास आल्याने वारणेचा वाघ सामाजिक संघटनेच्या संविधान दुगाने यांनी दि.13/7/2017 रोजी बिलोली तहसीलदार विनोद गुंडमवार यांना लेखी तक्रार देऊन रस्त्याच्या कामांची चौकशी करण्याची  मागणी केली होती.निवेदनाची दखल घेत  तहसीलदारानी चौकशीसाठी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग नांदेड यांना पत्र पाठविले खरे पण आम्हाला पत्रच मिळाले नाही,तुम्ही देगलूर बांधकाम विभागाकडे जाऊन विचारपूस करा तिथे पत्र गेले असेल असे उडवा उडविची उत्तर देत नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने या बाबींवर पडदा टाकला मात्र यांच्या नावाने काढलेले पत्र देगलूर ला कसे जाईल असा प्रश्न निर्माण होतो.कार्यकारी अभियंता नांदेड यांच्या सांगण्यावरून देगलूर बांधकाम विभागात ही विचारपूस केली असता तिथे पत्र आले नसल्याचे तेथील अभियंत्याने सांगितले.या संबंध बाबींवरुन बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्तिथ होत आहे.असे तक्रारदार संविधान दुगाणे चे म्हणणे आहे.
    नांदेड बांधकाम विभाग प्रशासन श्री.विलास पाटील टाकळीकर या गूत्तेदाराला पाठीशी घालून सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळत आहे.कारण ह्या रस्त्याच्या कामात काळी मातीचा वापर केल्यामुळे हा रस्ता जास्त काळ टिकणार नसून पूल सुद्धा लवकरच ढासाळतील.रस्त्यावर खड्डे पडून अपघात व जीवितहानि होण्याची संभावना नाकारता येणार नाही.या कामांची वरीष्ट शासकीय अभियंत्याकडून चौकशी करावी.
  संबधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून रस्त्याचे काम त्वरीत थांबवावे.रस्ता जर टिकावू बनवायचा असेल तर ते काम शासकीय कंत्राटदाराकडून पूर्ण करून घ्यावे.गेल्या चार महिन्यापासून या गंभीर बाबिकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाकडे वेळ नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन नांदेड च्या निषेधार्थ दि 13/10/17 पासून बिलोली तहसील कार्यालयासमोर बेमूदत आमरण उपोषण करीत असल्याचे संविधान दुगाणे यांनी निवेदनात नमूद केले आहे..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल *पहिल्याच टप्प्यात पाच एकर जमीन ताब्यात* बिलोली-  (शिवराज भायनुरे )  बिलोली तालुक्यात नावलौकिक असलेल्या सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून वन विभागाने गुन्हा दाखल करून 5 एकर जमीन ताब्यात घेतली आहे वन विभागाच्या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे संस्कृती संवर्धन मंडळाकडून वन अधिकार्‍यांवर राज्य पातळीवरील तबाव टाकण्याचा प्रकार चालू असल्याची माहिती समोर येत आहे बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील सर्वे नंबर 530 मध्ये वन विभागाची जवळपास 171 हेक्टर जमीन असल्याची माहिती आहे वन विभागाच्या जवळपास 15 एकर जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचे स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत संस्कृती संवर्धन शिक्षण मंडळाने येथील वन विभागाच्या जमीनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष शंकर महाजन यांनी लेखी तक्रारीद्वारे वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती एकीकडे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' चा नारा देत ...

त्यात्या वंचित शेतकऱ्यांसाठी आ. कडुंना दिले निवेदन लेंडी प्रकल्पावर विस्तृत केली चर्चा मुखेड प्रतिनिधी :-०३

            मुखेड  प्रतिनिधी :- बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क                     परीसरातील अनेक गावातील सन२०१६-१७ यामध्ये ४०० च्या जवळपास शेतकऱ्यांनी स्टेट बँक आँफ इंडिया या बँकेत रितसर पध्दतीने प्रधानमंञी पिकविमा योजना भरले होते . पण अध्यापर्यत त्या वंचित शेतकऱ्यांचा पिकविम्याचा लाभ मिळालाच नाही . या वंचित शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटुन आपले व्यथा मांडले , याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दि२४ रोजी लाक्षणिक उपोषण केले. तरी या मुजोर प्रशासनाने कोणतेच उत्तर देत नाही. यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चु कडू यांची भेट घेऊन मुखेड तालुका प्रमुख मन्मथ खंकरे, ता.सरचिटणीस निखील कोयलकोंडेवार , निखील गोगा, अविनाश जाधव यांनी भेट घेऊन विस्तृत चर्चा केली...            मुक्रमाबाद येथील गेल्या ३५ ते ४० वर्षापासुन  रखडीत असलेल्या लेंडी धरणा संदर्भात , अगोदर पुणर्वसन नंतर धरण , व परीसरातील अनेक गावांचे झालेले पुणर्वसन संदर्भात यासह अ...