बिलोली-देगलूर मार्गावरील लक्ष्मी कन्स्ट्रक्शन चे काम त्वरीत थांबविन्याची मागणी....! 13 नोव्हेंबर पासून बेमूदत आमरण उपोषण.. 🏻बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे
बिलोली-देगलूर मार्गावरील लक्ष्मी कन्स्ट्रक्शन चे काम त्वरीत थांबविन्याची मागणी....!
13 नोव्हेंबर पासून बेमूदत आमरण उपोषण..
🏻बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे
महाराष्ट्र कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या बिलोली देगलूर मार्गावर लक्ष्मी कन्स्ट्रक्शन अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण व पूल बांधणी चे काम 16 किमी अंतरावर बऱ्याच दिवसापासून चालू आहे.पण हे काम एकदम निकृष्ट पद्धतीचे होत असून रस्त्याच्या रुंदीकरनासाठी मुरुमाएवजी काळी मातीचा तसेच डष्टरहित गिट्टिचा वापर मोठ्याप्रमात केला जात आहे.तर पूलाच्या कामासाठी सीमेंट कोन्क्रेट ऐवजी मोठ-मोठ्या दगडांचा वापर करून वर-वरून सीमेंट चा लेप देऊन पुलाचे काम पूर्ण करत असल्याचे निदर्शनास आल्याने वारणेचा वाघ सामाजिक संघटनेच्या संविधान दुगाने यांनी दि.13/7/2017 रोजी बिलोली तहसीलदार विनोद गुंडमवार यांना लेखी तक्रार देऊन रस्त्याच्या कामांची चौकशी करण्याची मागणी केली होती.निवेदनाची दखल घेत तहसीलदारानी चौकशीसाठी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग नांदेड यांना पत्र पाठविले खरे पण आम्हाला पत्रच मिळाले नाही,तुम्ही देगलूर बांधकाम विभागाकडे जाऊन विचारपूस करा तिथे पत्र गेले असेल असे उडवा उडविची उत्तर देत नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने या बाबींवर पडदा टाकला मात्र यांच्या नावाने काढलेले पत्र देगलूर ला कसे जाईल असा प्रश्न निर्माण होतो.कार्यकारी अभियंता नांदेड यांच्या सांगण्यावरून देगलूर बांधकाम विभागात ही विचारपूस केली असता तिथे पत्र आले नसल्याचे तेथील अभियंत्याने सांगितले.या संबंध बाबींवरुन बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्तिथ होत आहे.असे तक्रारदार संविधान दुगाणे चे म्हणणे आहे.
नांदेड बांधकाम विभाग प्रशासन श्री.विलास पाटील टाकळीकर या गूत्तेदाराला पाठीशी घालून सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळत आहे.कारण ह्या रस्त्याच्या कामात काळी मातीचा वापर केल्यामुळे हा रस्ता जास्त काळ टिकणार नसून पूल सुद्धा लवकरच ढासाळतील.रस्त्यावर खड्डे पडून अपघात व जीवितहानि होण्याची संभावना नाकारता येणार नाही.या कामांची वरीष्ट शासकीय अभियंत्याकडून चौकशी करावी.
संबधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून रस्त्याचे काम त्वरीत थांबवावे.रस्ता जर टिकावू बनवायचा असेल तर ते काम शासकीय कंत्राटदाराकडून पूर्ण करून घ्यावे.गेल्या चार महिन्यापासून या गंभीर बाबिकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाकडे वेळ नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन नांदेड च्या निषेधार्थ दि 13/10/17 पासून बिलोली तहसील कार्यालयासमोर बेमूदत आमरण उपोषण करीत असल्याचे संविधान दुगाणे यांनी निवेदनात नमूद केले आहे..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा