डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा विशेष उपक्रम - बार्टी तर्फे चितोडिया समाजातील शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश देऊन कृतिशील पद्धतीने विद्यार्थी दिवस साजरा ...प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा विशेष उपक्रम -
बार्टी तर्फे चितोडिया समाजातील शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश देऊन कृतिशील पद्धतीने विद्यार्थी दिवस साजरा ...प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे
बिलोली प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या समतादूत प्रकल्पातर्फे शासन निर्णयानुसार जि.प.हायस्कूल,लोहगाव येथे विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे कि राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजे ०७ नोव्हेंबर १९०० असून या दिवशी खऱ्या अर्थाने माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी माणसाच्या प्रतिष्ठेकरता लढणार्या एका क्रांतीची,युगांतराची सुरुवात झाली.याअनुषंगाने त्यांचा शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला.
याचाच एक भाग म्हणून लोहगाव परिसरात बऱ्याच वर्षांपासून चितोडिया समाज वास्तव्यास आहे पण शिक्षण प्रवाहापासून वंचित आहे असे बार्टीतर्फे समतादूत इर्शाद शेख आणि समतादूत पांडुरंग मामीडवार यांनी केलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणांती निदर्शनास आले व या शाळाबाह्य मुलांना शिक्षणप्रवाहात आणावे यासाठी पालकांना मार्गदर्शन करून शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात आले.आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीमय शाळाप्रवेश दिनी म्हणजे ०७ नोव्हेंबर रोजी जि.प.हायस्कूल लोहगाव या शाळेच्या सहकार्याने येथील शाळेत सदर शाळाप्रवेश कार्यक्रमाचे नियोजन करून शाळाबाह्य मुलांना प्रवेश देऊन विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक गिरी व प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे, शिक्षणविस्तार अधिकारी सौ.भैरवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते दिलीप पांढरे, उपसरपंच शंकरराव राखे, ग्रामपंचायत सदस्य कांबळे,शा.व्य.समितीचे अध्यक्ष संतोष स्वामी,काँग्रेस सर्कल प्रमुख प्रल्हाद वानोळे, दै.पुण्यनगरीचे प्रतिनिधी गंगासागरे, चितोडिया समाजप्रमुख रघुवीरसिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी शाळाबाह्य मुलांना प्रवेश देऊन वही पेन साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक कोंडावार सर यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे यांनी बाबासाहेबांचा शाळाप्रवेश म्हणजे एक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल होती. डॉ.बाबासाहेबांचा सर्वानी आदर्श घेऊन वाटचाल करावी आणि स्वतःचा व समाजाचा जीवनमान उंचावण्यासाठी सतत प्रयत्नरत राहावे असे प्रतिपादन केले.शिक्षण विस्तार अधिकारी सौ भैरवाड यांनी चितोडिया समाजातील या सर्व मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिला जाईल असे आश्वासन दिले आणि दिलीप पांढरे यांनी बार्टीच्या या उपक्रमाचे कौतुक करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व विद्यार्थ्यांनी आदर्श घेऊन प्रचंड अभ्यास करून यशोशिखरावर जावे यासाठी शालेय विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.शाळेचे मुख्याध्यापक गिरी आणि समतादूत पांडुरंग मामीडवार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एक आदर्श विद्यार्थी व आजिवन विद्यार्थी होते याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेचे सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक पांचाळ यांनी केले तर आभार समतादूत इर्शाद शेख यांनी मानले.
बार्टी तर्फे चितोडिया समाजातील शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश देऊन कृतिशील पद्धतीने विद्यार्थी दिवस साजरा ...प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे
बिलोली प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या समतादूत प्रकल्पातर्फे शासन निर्णयानुसार जि.प.हायस्कूल,लोहगाव येथे विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे कि राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजे ०७ नोव्हेंबर १९०० असून या दिवशी खऱ्या अर्थाने माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी माणसाच्या प्रतिष्ठेकरता लढणार्या एका क्रांतीची,युगांतराची सुरुवात झाली.याअनुषंगाने त्यांचा शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला.
याचाच एक भाग म्हणून लोहगाव परिसरात बऱ्याच वर्षांपासून चितोडिया समाज वास्तव्यास आहे पण शिक्षण प्रवाहापासून वंचित आहे असे बार्टीतर्फे समतादूत इर्शाद शेख आणि समतादूत पांडुरंग मामीडवार यांनी केलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणांती निदर्शनास आले व या शाळाबाह्य मुलांना शिक्षणप्रवाहात आणावे यासाठी पालकांना मार्गदर्शन करून शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात आले.आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीमय शाळाप्रवेश दिनी म्हणजे ०७ नोव्हेंबर रोजी जि.प.हायस्कूल लोहगाव या शाळेच्या सहकार्याने येथील शाळेत सदर शाळाप्रवेश कार्यक्रमाचे नियोजन करून शाळाबाह्य मुलांना प्रवेश देऊन विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक गिरी व प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे, शिक्षणविस्तार अधिकारी सौ.भैरवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते दिलीप पांढरे, उपसरपंच शंकरराव राखे, ग्रामपंचायत सदस्य कांबळे,शा.व्य.समितीचे अध्यक्ष संतोष स्वामी,काँग्रेस सर्कल प्रमुख प्रल्हाद वानोळे, दै.पुण्यनगरीचे प्रतिनिधी गंगासागरे, चितोडिया समाजप्रमुख रघुवीरसिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी शाळाबाह्य मुलांना प्रवेश देऊन वही पेन साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक कोंडावार सर यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे यांनी बाबासाहेबांचा शाळाप्रवेश म्हणजे एक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल होती. डॉ.बाबासाहेबांचा सर्वानी आदर्श घेऊन वाटचाल करावी आणि स्वतःचा व समाजाचा जीवनमान उंचावण्यासाठी सतत प्रयत्नरत राहावे असे प्रतिपादन केले.शिक्षण विस्तार अधिकारी सौ भैरवाड यांनी चितोडिया समाजातील या सर्व मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिला जाईल असे आश्वासन दिले आणि दिलीप पांढरे यांनी बार्टीच्या या उपक्रमाचे कौतुक करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व विद्यार्थ्यांनी आदर्श घेऊन प्रचंड अभ्यास करून यशोशिखरावर जावे यासाठी शालेय विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.शाळेचे मुख्याध्यापक गिरी आणि समतादूत पांडुरंग मामीडवार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एक आदर्श विद्यार्थी व आजिवन विद्यार्थी होते याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेचे सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक पांचाळ यांनी केले तर आभार समतादूत इर्शाद शेख यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा