त्यात्या वंचित शेतकऱ्यांसाठी आ. कडुंना दिले निवेदन लेंडी प्रकल्पावर विस्तृत केली चर्चा मुखेड प्रतिनिधी :-०३
मुखेड प्रतिनिधी :- बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क
परीसरातील अनेक गावातील सन२०१६-१७ यामध्ये ४०० च्या जवळपास शेतकऱ्यांनी स्टेट बँक आँफ इंडिया या बँकेत रितसर पध्दतीने प्रधानमंञी पिकविमा योजना भरले होते . पण अध्यापर्यत त्या वंचित शेतकऱ्यांचा पिकविम्याचा लाभ मिळालाच नाही . या वंचित शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटुन आपले व्यथा मांडले , याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दि२४
रोजी लाक्षणिक उपोषण केले. तरी या मुजोर प्रशासनाने कोणतेच उत्तर देत नाही. यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चु कडू यांची भेट घेऊन मुखेड तालुका प्रमुख मन्मथ खंकरे, ता.सरचिटणीस निखील कोयलकोंडेवार , निखील गोगा, अविनाश जाधव यांनी भेट घेऊन विस्तृत चर्चा केली...
मुक्रमाबाद येथील गेल्या ३५ ते ४० वर्षापासुन रखडीत असलेल्या लेंडी धरणा संदर्भात , अगोदर पुणर्वसन नंतर धरण , व परीसरातील अनेक गावांचे झालेले पुणर्वसन संदर्भात यासह अनेक प्रलंबित विषयावर विधानसभेत आवाज उठवणार असे आ.बच्चु कडू यांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना सांगितले ...
औरंगाबाद येथे आ. बच्चु कडू यांची भेट घेऊन मुखेड तालुक्यातील विविध विषयावर निवेदन दिले या निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख मन्मथ खंकरे, ता.सरचिटणीस निखील कोयलकोंडेवार , शहर अध्यक्ष निखील गोगा, आविनाश जाधव , गिरीष बिचकुंदे, विरेश इंन्दुरे, यासह अनेक प्रहार सैनिकांनी निवेदन दिले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा