बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.
बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे
गेल्या अनेक दिवसांपासून बिलोली तहसिल कार्यालयातील कर्मचारी निवासी न राहता नांदेड सारख्या शहरात राहून येजा करीत असल्याने तहसिल कार्यालयाचे अनेक कामे वेळेत होत नसल्यामुळे जनतेची कामे खोळंबत असल्याने पत्रकार संरक्षण समिती बिलोली च्या वतिने विभागीय अधिकारी बिलोली यांना निवेदन देण्यात आले.
बिलोली तहसिल कार्यालयाचे तहसिलदार विनोद गुंडमवार हे बिलोली तहसिल येथे रुजू झाल्यापासून आजतागायत तहसील कार्यालयात नांदेड येथून ये-जा करीत आहेत. याचेच अनुकरण नायब तहसीलदार हे देखील नांदेड येथून ये-जा करित असुन मुख्यालया राहत नसूनही शासनाकडून घरभाडे उचल करीत शासनाची दिशाभूल करीत आहेत याचाच अर्थ उंटावरुन शेळ्या हाकण्यासारखा कारभार सदरील तहसील कर्मच्यार्यांचा झाला आहे. यामुळे तालुक्यातील निराधार, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व बिलोली तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग उद्भवल्यास याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न तहसिलदार ये-जा करीत आसल्या कारणांमुळे अनेक कामे खोळंबत असल्याने जनतेची गैरसोय होत आहे.
बिलोली तालुक्यातील जनतेची गैरसोय दुर करण्यासाठी पत्रकार संरक्षण समिति बिलोली च्या वतिने बिलोली तहसिल कार्यालयात बायोमीट्रिक मशीन चालू करने, स्वच्छता गृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनरेटर व इन्हेटरची व्यवस्था चालू करण्यात यावी इत्यादी मागणी संदर्भात उपविभागीय अधिकारी बिलोली यांना निवेदन देण्यात आले.सदरील निवेदनावर संजयकुमार बिलोलीकर , प्रकाश फुगारे, सय्यद रियाज, गणेश गिरगावकर, वैभव घाटे, मनोहर कंजे, मारोती खतगावकर, संजय जाधव, धम्मपाल जाधव, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे
गेल्या अनेक दिवसांपासून बिलोली तहसिल कार्यालयातील कर्मचारी निवासी न राहता नांदेड सारख्या शहरात राहून येजा करीत असल्याने तहसिल कार्यालयाचे अनेक कामे वेळेत होत नसल्यामुळे जनतेची कामे खोळंबत असल्याने पत्रकार संरक्षण समिती बिलोली च्या वतिने विभागीय अधिकारी बिलोली यांना निवेदन देण्यात आले.
बिलोली तहसिल कार्यालयाचे तहसिलदार विनोद गुंडमवार हे बिलोली तहसिल येथे रुजू झाल्यापासून आजतागायत तहसील कार्यालयात नांदेड येथून ये-जा करीत आहेत. याचेच अनुकरण नायब तहसीलदार हे देखील नांदेड येथून ये-जा करित असुन मुख्यालया राहत नसूनही शासनाकडून घरभाडे उचल करीत शासनाची दिशाभूल करीत आहेत याचाच अर्थ उंटावरुन शेळ्या हाकण्यासारखा कारभार सदरील तहसील कर्मच्यार्यांचा झाला आहे. यामुळे तालुक्यातील निराधार, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व बिलोली तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग उद्भवल्यास याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न तहसिलदार ये-जा करीत आसल्या कारणांमुळे अनेक कामे खोळंबत असल्याने जनतेची गैरसोय होत आहे.
बिलोली तालुक्यातील जनतेची गैरसोय दुर करण्यासाठी पत्रकार संरक्षण समिति बिलोली च्या वतिने बिलोली तहसिल कार्यालयात बायोमीट्रिक मशीन चालू करने, स्वच्छता गृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनरेटर व इन्हेटरची व्यवस्था चालू करण्यात यावी इत्यादी मागणी संदर्भात उपविभागीय अधिकारी बिलोली यांना निवेदन देण्यात आले.सदरील निवेदनावर संजयकुमार बिलोलीकर , प्रकाश फुगारे, सय्यद रियाज, गणेश गिरगावकर, वैभव घाटे, मनोहर कंजे, मारोती खतगावकर, संजय जाधव, धम्मपाल जाधव, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा