बाबासाहेबांचा लढा हा जातीअंताचा होता...प्रकल्पाधिकारी सुजाता पोहरे.
बिलोली - वैभव घाटे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून मौजे चिंचाळा ता.बिलोली येथे धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.
बार्टीचे महासंचालक डॉ.राजेश धाबरे यांच्या संकल्पनेतून मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे मँडम आणि औरंगाबाद विभागीय प्रकल्प संचालक डॉ.श्रीकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा करण्याबाबत जिल्हानिहाय नियोजन देण्यात आले होते.
बार्टीचे समतादूत नांदेड जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे मँडम यांच्या उपस्थिती आणि मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत आणि जि.प.प्रा.शाळा यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करण्यात आले.बिलोली तालुक्याच्या वतीने कार्यक्रमाची सुरुवात ही सकाळी समता प्रभातफेरीने झाली.समता प्रभात फेरीच्या माध्यमांतून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकारण्यामागची कारणमीमांसा स्पष्ट करण्यात आली.त्यानंतर मुक्ति कोण पथे या पुस्तकांचे वाचन करून बुद्धवंदना घेण्यात आली.
तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस युवा नेत्रुत्व तथा सरपंच प्रतिनिधि शैलेश पाटील, प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे,केंद्रप्रमुख डि.टी.वाघमारे,शालेय व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील ,मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे ,समतादूत महेश हिगोले यांच्या हस्ते पुष्पांहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तदनंतर मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रनिर्माते आहेत.त्यांचा लढा हा जातीअंताचा शोषणमुक्तिचा होता.माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठीच त्यांचा महत्वपूर्ण संघर्ष होता.राज्यघटनेने समतेच्या तत्वावर आधारित दिलेला मतदानाचा अधिकार कुठल्याही आमिषाला बळी पडून विकु नका.
स्वाभिमान गहाण टाकू नका.संत महापुरुष समाजसुधारक यांची विचारधारा जर खऱ्या अर्थाने आचरणात आणली तर सुंदर समताशील,विवेकी,सात्विक व डोळस समाजाची निर्मिती होईल असे प्रतिपादन त्यानी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन समतादूत पांडुरंग मामीडवार यांनी केले तर आलेल्या मान्यवराचे आणि गावकरीचे आभार समतादूत इर्शाद शेख यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी ग्रामपंचायत कार्यालय व जि.प.प्रा.शाळा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाने महत्वपूर्ण परिश्रम घेतले.
यावेळी सहशिक्षक विजय कुराडे,शेख सर, सौ. बचेवार ,सौ.जळपतराव ,समतादूत महेश हिंगोले ,गावकरी ,महिला वर्ग,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते बंडु तोडेराव यांची उपस्थिति होती.
बिलोली - वैभव घाटे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून मौजे चिंचाळा ता.बिलोली येथे धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.
बार्टीचे महासंचालक डॉ.राजेश धाबरे यांच्या संकल्पनेतून मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे मँडम आणि औरंगाबाद विभागीय प्रकल्प संचालक डॉ.श्रीकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा करण्याबाबत जिल्हानिहाय नियोजन देण्यात आले होते.
बार्टीचे समतादूत नांदेड जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे मँडम यांच्या उपस्थिती आणि मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत आणि जि.प.प्रा.शाळा यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करण्यात आले.बिलोली तालुक्याच्या वतीने कार्यक्रमाची सुरुवात ही सकाळी समता प्रभातफेरीने झाली.समता प्रभात फेरीच्या माध्यमांतून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकारण्यामागची कारणमीमांसा स्पष्ट करण्यात आली.त्यानंतर मुक्ति कोण पथे या पुस्तकांचे वाचन करून बुद्धवंदना घेण्यात आली.
तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस युवा नेत्रुत्व तथा सरपंच प्रतिनिधि शैलेश पाटील, प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे,केंद्रप्रमुख डि.टी.वाघमारे,शालेय व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील ,मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे ,समतादूत महेश हिगोले यांच्या हस्ते पुष्पांहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तदनंतर मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रनिर्माते आहेत.त्यांचा लढा हा जातीअंताचा शोषणमुक्तिचा होता.माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठीच त्यांचा महत्वपूर्ण संघर्ष होता.राज्यघटनेने समतेच्या तत्वावर आधारित दिलेला मतदानाचा अधिकार कुठल्याही आमिषाला बळी पडून विकु नका.
स्वाभिमान गहाण टाकू नका.संत महापुरुष समाजसुधारक यांची विचारधारा जर खऱ्या अर्थाने आचरणात आणली तर सुंदर समताशील,विवेकी,सात्विक व डोळस समाजाची निर्मिती होईल असे प्रतिपादन त्यानी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन समतादूत पांडुरंग मामीडवार यांनी केले तर आलेल्या मान्यवराचे आणि गावकरीचे आभार समतादूत इर्शाद शेख यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी ग्रामपंचायत कार्यालय व जि.प.प्रा.शाळा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाने महत्वपूर्ण परिश्रम घेतले.
यावेळी सहशिक्षक विजय कुराडे,शेख सर, सौ. बचेवार ,सौ.जळपतराव ,समतादूत महेश हिंगोले ,गावकरी ,महिला वर्ग,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते बंडु तोडेराव यांची उपस्थिति होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा