मुख्य सामग्रीवर वगळा

बाबासाहेबांचा लढा हा जातीअंताचा होता...प्रकल्पाधिकारी सुजाता पोहरे.

बाबासाहेबांचा लढा हा जातीअंताचा होता...प्रकल्पाधिकारी सुजाता पोहरे.

बिलोली - वैभव घाटे 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून मौजे चिंचाळा ता.बिलोली येथे धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.
बार्टीचे महासंचालक डॉ.राजेश धाबरे यांच्या संकल्पनेतून मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे मँडम आणि औरंगाबाद विभागीय प्रकल्प संचालक डॉ.श्रीकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा करण्याबाबत जिल्हानिहाय नियोजन देण्यात आले होते.
बार्टीचे  समतादूत नांदेड जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे मँडम यांच्या उपस्थिती आणि मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत आणि जि.प.प्रा.शाळा यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करण्यात आले.बिलोली तालुक्याच्या वतीने कार्यक्रमाची सुरुवात ही  सकाळी समता प्रभातफेरीने झाली.समता प्रभात फेरीच्या माध्यमांतून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकारण्यामागची कारणमीमांसा स्पष्ट करण्यात आली.त्यानंतर मुक्ति कोण पथे या पुस्तकांचे वाचन करून बुद्धवंदना घेण्यात आली.
तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस युवा नेत्रुत्व तथा सरपंच प्रतिनिधि शैलेश पाटील, प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे,केंद्रप्रमुख डि.टी.वाघमारे,शालेय  व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील ,मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे ,समतादूत महेश हिगोले यांच्या हस्ते पुष्पांहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तदनंतर मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रनिर्माते आहेत.त्यांचा लढा हा जातीअंताचा शोषणमुक्तिचा होता.माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठीच त्यांचा महत्वपूर्ण संघर्ष होता.राज्यघटनेने समतेच्या तत्वावर आधारित दिलेला मतदानाचा अधिकार कुठल्याही आमिषाला बळी पडून विकु नका.
स्वाभिमान गहाण टाकू नका.संत महापुरुष समाजसुधारक यांची विचारधारा जर खऱ्या अर्थाने आचरणात आणली तर सुंदर समताशील,विवेकी,सात्विक व डोळस समाजाची निर्मिती होईल असे प्रतिपादन त्यानी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन समतादूत पांडुरंग मामीडवार यांनी केले तर आलेल्या मान्यवराचे आणि गावकरीचे आभार समतादूत इर्शाद शेख यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी ग्रामपंचायत कार्यालय व जि.प.प्रा.शाळा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाने महत्वपूर्ण परिश्रम घेतले.
यावेळी सहशिक्षक विजय कुराडे,शेख सर, सौ. बचेवार ,सौ.जळपतराव ,समतादूत महेश हिंगोले ,गावकरी ,महिला वर्ग,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ कार्यकर्ते तसेच  सामाजिक कार्यकर्ते बंडु तोडेराव यांची उपस्थिति होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले

* लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले*   * नांदेड :-  वैभव घाटे*  मेसचे बिल मंजूर करण्यासाठी गृहपाल किशोरी अलोने यांना २० हजाराची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. हदगाव येथील समाज कल्याण विभागाच्या मुलीच्या वसतिगृहात त्या कार्यरत असून याच ठिकाणी त्यांना पकडण्यात आले.     हदगाव येथे समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह आहे. येथे ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनी राहत असून किशोरी अलोने या गृहपाल आहेत. वसतिगृहात कार्यरत असलेल्या खानावळीचे बिल काढताना विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरावी भरावी लागते. हि बाब लक्षात घेऊन अलोने यांनी मेस चालकाची अडवणूक करत विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरण्यासाठी २० हजार रुपयाची मागणी केली. यानंतर मेस चालकाने याबाबत नांदेड एसीबी कडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करत आज सकाळी ११ वाजता नांदेड एसीबी ने शासकीय वसतिगृह परिसरात सापळा रचला. यावेळी अलोने या मेस चालकाकडून २० हजाराची लाच स्वीकारताना एसिबी च्या जाळ्यात अडकल्या.     याप्रकरणात हदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा सापळा पोलीस अधीक्षक संजय ला

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.  बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे  गेल्या अनेक दिवसांपासून बिलोली तहसिल कार्यालयातील कर्मचारी निवासी न राहता नांदेड सारख्या शहरात राहून येजा करीत असल्याने तहसिल कार्यालयाचे अनेक कामे वेळेत होत नसल्यामुळे जनतेची कामे खोळंबत असल्याने पत्रकार  संरक्षण समिती  बिलोली च्या वतिने विभागीय अधिकारी बिलोली यांना निवेदन देण्यात आले. बिलोली तहसिल कार्यालयाचे तहसिलदार विनोद गुंडमवार हे बिलोली तहसिल येथे रुजू झाल्यापासून आजतागायत तहसील कार्यालयात नांदेड येथून ये-जा करीत आहेत. याचेच अनुकरण नायब तहसीलदार हे देखील नांदेड येथून ये-जा करित असुन मुख्यालया राहत नसूनही शासनाकडून घरभाडे उचल करीत शासनाची दिशाभूल करीत आहेत याचाच अर्थ उंटावरुन शेळ्या हाकण्यासारखा कारभार सदरील तहसील कर्मच्यार्यांचा झाला आहे. यामुळे तालुक्यातील निराधार, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व बिलोली तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग उद्भवल्यास याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न तहसिलदार ये-जा करीत आसल्या कारणांमुळे अनेक कामे खोळंबत असल्याने जनतेची गैरसोय होत आहे.  बिलोली तालुक्यातील जनतेची गैरसोय दुर क

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध -------------------------------------------------------------  बिलोली     हिंगोली जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला.या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ ता.बिलोलीच्या वतीने जाहिर निषेध करून हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीचे निवेदन तहसिलदार बिलोली यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडे पाठवले आले.    हिंगोलीचे जेष्ठ पञकार व जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर दि.२३ आक्टोंबर रोजी अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक केला.हि घटना घडून ३ दिवस उलटले तरी पोलिसांना आरोपीस पकडण्यात अध्याप अश आले नाही.यामुळे तालुक्यातील पञकारांमध्ये संतापाची लाठ उसळली असून दिलेल्या निवेदनात आपल्या भावना प्रकट करून मा.मुख्यमंञी यांच्याकडे नायब तहसिलदार संजय नागमवाड यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.यावेळी पञकार संघाचे अध्यक्ष  राजेंद्र पा.शिंदे,संघाचे प्रमुख गोविंद मुंडकर,कार्याध्यक्ष बाबूराव इंगळे,उपाध्यक्ष