नायगाव तालुक्यात नैसर्गिक अपत्तीचे थैमान खैरगावात वीज पडून एक ठार तर पत्नी व मुलगा जखमी आणि दुसऱ्या घटनेत दोन बैलासह मोर ईकळीचा केशव जखमी .
नायगाव तालुक्यात नैसर्गिक अपत्तीचे थैमान खैरगावात वीज पडून एक ठार तर पत्नी व मुलगा जखमी आणि दुसऱ्या घटनेत दोन बैलासह मोर ईकळीचा केशव जखमी .
नायगाव - माधव पवार
नायगाव तालुक्यात दररोज नैसर्गिक आपत्तीने थैमान घातले असून दिनांक १५ ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान तालुक्यासह रुई बु परिसरात आवकाळी पावसाने मेघ गर्जनेसह पाऊस पडल्याने त्यात वीज कोसळुन खैरगाव येथील एका शेतात मयत व्यंकट भाऊराव कल्याण वय ४८ वर्ष हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी सौ गिरजाबाई व्यंकट कल्याण वय ४५ वर्ष आणि त्यांचा मुलगा प्रदीप व्यंकट कल्याण वय २७ वर्ष हे जखमी झाल्याने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते असी माहीती नायगावचे तहसीलदार श्रीमती सुरेखाताई नांदे यांनी दिली असून दुसऱ्या घटनेतील दुगाव तालुका बिलोली येथील रहिवासी असलेला शेतकरी नारायण किशनराव शिंदे यांचे शेतं कौठाळा तालुका नायगाव या शिवरात असलेल्या आपल्या शेतात बैल लिंबाच्या झाडाला बांधून त्यानी शेतात असलेल्या टीनापत्राच्या झोपडीत बसला असताना त्यांचा साठ हजारांचा बैल वीज पडून मरण पावला तर तिसऱ्या घटनेत मोरईकळी येथील रहिवासी असलेला केशव जयराम मोरे यांनी सुध्दा आपला बैल लिंबाच्या झाडाखाली बांधला असताना बैलावर वीज पडून अंदाजे पन्नास हजार रूपयाचा बैल ठार झाला तर केशव जयराम मोरे हा जखमी झाला असल्याची माहीती कुंटूर ठाण्याचे सपोनी विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जेमादार निकम् . नाईकवाडे . मठपती यानी माहीती दिली असून सदर जखमी युवकाला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे
तालुक्यातील हिप्परगा येथे दिनांक १४ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान १७ वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वर संभाजी कदम हा वीज पडल्याने जखमी झाला होता तर त्यांच्या बैल ठार झाला होता तालुक्यातील मौजे हिप्परगा येथील रहिवासी असलेले शेतकरी संभाजी दतराम पाटील कदम यांनी आपल्या शेतात कामा निमित्त बैल घेवुन गेला होता तर गणेश इरन्ना पाटील कदम यांची गाय वीज पडून ठार झाली होती सदरची नैसर्गिक आपत्ती अचानक कोसळत असल्याने नायगाव तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून सध्या सोयाबीन काढण्याचे काम चालु असून रानात गेलेल्या महिला वर्ग चांगलेच धास्तावले आहेत दिनांक १५ ऑक्टोंबर रोजी दुपारी ठीक दोन तीन वाजण्याच्या दरम्यान पूर्वेकडून ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि एका क्षणात आभाळातील ढग गर्जना करू लागले पावसासह विजेचा कडकडाट होवून या वेगवेगळया घटनेत नैसर्गिक आपत्ती कोसळल्याचे जनतेतुन बोलल्या जात असून सदर नायगाव तालुक्यात दररोज पावसाने थैमान घालून जनावरासह माणसाचे प्राण घेत आहेत असी चर्चा होत असली तरी नायगाव तालुक्यात चांगलेच पावसाने थैमान घातले आहे
नायगाव - माधव पवार
नायगाव तालुक्यात दररोज नैसर्गिक आपत्तीने थैमान घातले असून दिनांक १५ ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान तालुक्यासह रुई बु परिसरात आवकाळी पावसाने मेघ गर्जनेसह पाऊस पडल्याने त्यात वीज कोसळुन खैरगाव येथील एका शेतात मयत व्यंकट भाऊराव कल्याण वय ४८ वर्ष हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी सौ गिरजाबाई व्यंकट कल्याण वय ४५ वर्ष आणि त्यांचा मुलगा प्रदीप व्यंकट कल्याण वय २७ वर्ष हे जखमी झाल्याने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते असी माहीती नायगावचे तहसीलदार श्रीमती सुरेखाताई नांदे यांनी दिली असून दुसऱ्या घटनेतील दुगाव तालुका बिलोली येथील रहिवासी असलेला शेतकरी नारायण किशनराव शिंदे यांचे शेतं कौठाळा तालुका नायगाव या शिवरात असलेल्या आपल्या शेतात बैल लिंबाच्या झाडाला बांधून त्यानी शेतात असलेल्या टीनापत्राच्या झोपडीत बसला असताना त्यांचा साठ हजारांचा बैल वीज पडून मरण पावला तर तिसऱ्या घटनेत मोरईकळी येथील रहिवासी असलेला केशव जयराम मोरे यांनी सुध्दा आपला बैल लिंबाच्या झाडाखाली बांधला असताना बैलावर वीज पडून अंदाजे पन्नास हजार रूपयाचा बैल ठार झाला तर केशव जयराम मोरे हा जखमी झाला असल्याची माहीती कुंटूर ठाण्याचे सपोनी विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जेमादार निकम् . नाईकवाडे . मठपती यानी माहीती दिली असून सदर जखमी युवकाला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे
तालुक्यातील हिप्परगा येथे दिनांक १४ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान १७ वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वर संभाजी कदम हा वीज पडल्याने जखमी झाला होता तर त्यांच्या बैल ठार झाला होता तालुक्यातील मौजे हिप्परगा येथील रहिवासी असलेले शेतकरी संभाजी दतराम पाटील कदम यांनी आपल्या शेतात कामा निमित्त बैल घेवुन गेला होता तर गणेश इरन्ना पाटील कदम यांची गाय वीज पडून ठार झाली होती सदरची नैसर्गिक आपत्ती अचानक कोसळत असल्याने नायगाव तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून सध्या सोयाबीन काढण्याचे काम चालु असून रानात गेलेल्या महिला वर्ग चांगलेच धास्तावले आहेत दिनांक १५ ऑक्टोंबर रोजी दुपारी ठीक दोन तीन वाजण्याच्या दरम्यान पूर्वेकडून ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि एका क्षणात आभाळातील ढग गर्जना करू लागले पावसासह विजेचा कडकडाट होवून या वेगवेगळया घटनेत नैसर्गिक आपत्ती कोसळल्याचे जनतेतुन बोलल्या जात असून सदर नायगाव तालुक्यात दररोज पावसाने थैमान घालून जनावरासह माणसाचे प्राण घेत आहेत असी चर्चा होत असली तरी नायगाव तालुक्यात चांगलेच पावसाने थैमान घातले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा