मुख्य सामग्रीवर वगळा

भाजपा सरकारला वटणीवर आणण्यासाठी एस टी कामगारांचा स्मार्टसंप राजकीय खेळीतुन काँग्रेसचा पाठींबा ?

भाजपा सरकारला वटणीवर आणण्यासाठी एस टी कामगारांचा स्मार्टसंप राजकीय खेळीतुन काँग्रेसचा पाठींबा ?


नायगाव प्रतिनिधी - माधव पवार
राज्यातले सरकार असो की केंद्रातले सतेवर असल्याच्या नंतर फार मोठी जवाबदारी असते परंतु महाराष्ट्रातील एस टी कामगार दिनांक १६ ऑक्टोंबरच्या मध्यरात्री पासून संपावर गेल्यामुळे नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गासह अन्य ठिकाणच्या रस्त्यावर वहाणाऱ्या एस टी बसेस संपामुळे बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय झालीच परंतु लाखो रुपयाचे नुकसान सुध्दा ऐन दीपावलीच्या मुहूर्तावर झाल्याने त्यांचा फटका अखेर जनतेला बसणार असलातरी सदरच्या संपामुळे भाजपा सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी एस टी कामगाराने स्मार्ट संप पुकारला असल्याचे जनतेतुन बोलल्या जात असून सन २००४ ते २००६ या कालावधीत तत्कालीन परिवहन मंत्री तथा नांदेडचे सध्याचे खासदार अशोकराव चव्हाण हे होते त्यांच्या कार्यकाळात कसल्याच प्रकारचा स्मार्ट संप झाला नसल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तथा उपसरपंच  घुंगराळा वसंत सुगावे. बालाजी मदेवाड सरपंच ( बरबडा ) माजी सरपंच नागनाथ हांनमते राज्य परिवहन मंडळात एकूण ३२ वर्ष सेवा करणारे सेवा निवृत्त कर्मचारी चालक संभाजी तुरटवाड . तसेच २२ वर्ष सेवा करणारे व्यंकटराव सुगावे यानी असे सांगितले की एस टी महामंडळाचे उत्पन्न कमी असल्याने असाच दोन दिवसांचा संप डिसेंबर २०१६ रोजी होता शासनानी  सातवा वेतन आयोग लागू करत नसल्याचे सांगत सर्वच संघटना मिळून असा संप झाला नसल्याचे त्यांचे म्हणे आहे
    महाराष्ट्र राज्यात भाजपा व शिवसेना युतीचे सरकार . असल्याने राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या काळात ऐन दिवाळीच्या तोंडावर हा एस टी कामगारांचा संप होत असल्याने या स्मार्ट संपामुळे मागे राजकीय खेळीतून संप होत असल्याने सदर स्मार्ट संपाला काँग्रेस पक्षांचा पाठींबा असावा ? असा प्रश्ण ग्रामीण भागातील जनतेला पडला असून नांदेड ते हैद्राबाद राज्य मार्गावर एस टी बसेस संपामुळे बंद पडल्याने दिनांक ऑक्टोबर रोजी सदरील राज्य महामार्गावर खाजगी बसेस व काळीपिवळी जीप . आटो मध्ये प्रवाशी कोंबडया प्रमाणे भरून वाहतूक केल्याचे दिसून आले असले तरी भूत काळात कधी असा संप झाला नाही एस टी कामगारांचा बेमुदत संपामुळे खाजगी वाहन धारकाने प्रवाशां कडून टिकीटा पेक्षाही दुप्पट आकारणी करुन आर्थिक लूट होत दिसून आले तरी हा स्मार्ट संप म्हणजे भाजप युती सरकारला वटनीवर आणण्यासाठी एस टी महामंडळाच्या कामगारने पुकारला असल्याचे . सदररील जनतेतुन बोलल्या जात आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल *पहिल्याच टप्प्यात पाच एकर जमीन ताब्यात* बिलोली-  (शिवराज भायनुरे )  बिलोली तालुक्यात नावलौकिक असलेल्या सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून वन विभागाने गुन्हा दाखल करून 5 एकर जमीन ताब्यात घेतली आहे वन विभागाच्या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे संस्कृती संवर्धन मंडळाकडून वन अधिकार्‍यांवर राज्य पातळीवरील तबाव टाकण्याचा प्रकार चालू असल्याची माहिती समोर येत आहे बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील सर्वे नंबर 530 मध्ये वन विभागाची जवळपास 171 हेक्टर जमीन असल्याची माहिती आहे वन विभागाच्या जवळपास 15 एकर जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचे स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत संस्कृती संवर्धन शिक्षण मंडळाने येथील वन विभागाच्या जमीनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष शंकर महाजन यांनी लेखी तक्रारीद्वारे वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती एकीकडे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' चा नारा देत ...

त्यात्या वंचित शेतकऱ्यांसाठी आ. कडुंना दिले निवेदन लेंडी प्रकल्पावर विस्तृत केली चर्चा मुखेड प्रतिनिधी :-०३

            मुखेड  प्रतिनिधी :- बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क                     परीसरातील अनेक गावातील सन२०१६-१७ यामध्ये ४०० च्या जवळपास शेतकऱ्यांनी स्टेट बँक आँफ इंडिया या बँकेत रितसर पध्दतीने प्रधानमंञी पिकविमा योजना भरले होते . पण अध्यापर्यत त्या वंचित शेतकऱ्यांचा पिकविम्याचा लाभ मिळालाच नाही . या वंचित शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटुन आपले व्यथा मांडले , याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दि२४ रोजी लाक्षणिक उपोषण केले. तरी या मुजोर प्रशासनाने कोणतेच उत्तर देत नाही. यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चु कडू यांची भेट घेऊन मुखेड तालुका प्रमुख मन्मथ खंकरे, ता.सरचिटणीस निखील कोयलकोंडेवार , निखील गोगा, अविनाश जाधव यांनी भेट घेऊन विस्तृत चर्चा केली...            मुक्रमाबाद येथील गेल्या ३५ ते ४० वर्षापासुन  रखडीत असलेल्या लेंडी धरणा संदर्भात , अगोदर पुणर्वसन नंतर धरण , व परीसरातील अनेक गावांचे झालेले पुणर्वसन संदर्भात यासह अ...