मुख्य सामग्रीवर वगळा

धावपळीच्या जीवनातील राजकारणाचे वादळ भाजपा पक्षावर मात करीत काँग्रेसच्या विराट विजयाने भाजप हादरला.

धावपळीच्या जीवनातील राजकारणाचे  वादळ भाजपा पक्षावर मात करीत काँग्रेसच्या विराट विजयाने भाजप हादरला.

नायगाव - माधव पवार

राजकारण म्हटले की धावपळीच्या जीवनातील राजकारणातचे वादळ या वादळात भाजपा पक्षावर मात करीत काँग्रेसच्या विराट विजयाने चांगलेच भाजपाचे नेते मंडळीला हादरा बसल्याचे या महानगर पालीकेच्या निकालातुन दिसून आले
खाजगी व्यासपीठावर सारेच राजकीय पुढारी नेते मंडळी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते असतात परंतु निवडणुका आल्या लागल्या की मात्र आकाशातील मेघ गरजेनेसारखे गर्जत असतात  आकाशात किती ही काळेकोट आभाळ आले तरी एखादंया वेळेस पाऊस बरसत नाही तशाच पद्धतीने देशभरात भाजपाची मोठी लाट असली तरी ती लाट नांदेडच्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत कुचकामी ठरली आणि काँग्रेस पक्षाच्या एक हाती सता देवून नांदेडच्या मतदारांनी महाराष्ट्राचे  माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे ताकत लावून एकंदरीत काँग्रेस पक्षांची हिंमत वाढवीली असे जनतेने व्यक्त केलेली मते आहेत यात कांही शंका नाही तशाच पद्धतीने नायगाव विधान सभा मतदार संघाचे आमदार वसंतराव चव्हाण यांची सुध्दा नायगावच्या नगर पालिकेवर काँग्रेसची सता असून तसेच बरबडा जिल्हा परिषद गटासह  नायगाव पंचायत समितीवर मार्केट कमिटी तालुक्यातील कांही पंचायत समितीचे सदस्य . काल परवाच ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सुध्दा काँग्रेस पक्षाची सत्ता काबीज आहे
      राजकारण म्हटले की राजकारणात कधी ना कधी  कमी जास्त होवू शकते सन १८८७ ला काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्या पासून काँग्रेसची जनतेला चांगली ओळख आहे एवढे असताना सुध्दा या भारत देशातील सता एका राज्याचे मुख्यमंत्री पद भोगलेले माननीय नरेंद्रजी मोदी या देशातील काँग्रेसची सत्ता उलथून टाकून महान भारत देशांचे पंतप्रधान झाले ही त्यांची किमया नाही या देशातील सवाशे कोठी नागरिकांची किमया असल्याचे जिल्हा भरातील जनतेचे स्पष्ट मत असून दिनांक ११ ऑक्टोंबर रोजी नांदेड येथील महानगर पालिकेच्या निवडणुका झाल्या निवडणुकी पूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाच्या  प्रचारासाठी नांदेड येथे आले होते परंतु याच ठिकाणचे भूमीपुत्र असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी या महाराष्ट्राचे नेतृत्व केले आणि . चव्हाण हे नांदेड जिल्ह्याचे खासदार आहे
      ज्या काँग्रेस पक्षांनी अशोकराव चव्हाण यांच्यावर  विश्वास टाकला त्या विश्वासाला थोडा फार ही तडा जावु न देता नांदेड येथील महानगर पालिकेत एक हाती सता प्राप्त करुन घेतले हे कशाचे प्रतीक आहे हे मात्र समजावून घेण्याची गरज भासत असून अशोकराव चव्हाण हे विकासअभिमुख नेतृत्व अनेक नेत्यांनी पक्षातुन बाहेर पडून आदला बदल चालु केली परत काँग्रेस मध्ये आले परत गेले परंतु माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी कधी आपला पक्ष सोडला नाही कारण आपण ज्या पक्षा पासून अनेक पदे भोगली त्या पक्षाला गदारी करण्यासाठी शोभत नाही या हेतूने काँग्रेस पक्षाची साथ सोडली नाही म्हणून चव्हाण हे एक एकनिष्ट आहेत त्या करीता नांदेडकरांनी दाखवलेल्या आपुलकीची परत फेड करण्यासाठी खासदार अशोकराव चव्हाण हे कठीबद्ध राहत असतात असे जनतेचे मत असले तरी शेवटी राजकारण आहे राजकारणात चढ़ उतार होवू शेकतो बदल होतच असतात हे मात्र निश्चीत आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल *पहिल्याच टप्प्यात पाच एकर जमीन ताब्यात* बिलोली-  (शिवराज भायनुरे )  बिलोली तालुक्यात नावलौकिक असलेल्या सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून वन विभागाने गुन्हा दाखल करून 5 एकर जमीन ताब्यात घेतली आहे वन विभागाच्या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे संस्कृती संवर्धन मंडळाकडून वन अधिकार्‍यांवर राज्य पातळीवरील तबाव टाकण्याचा प्रकार चालू असल्याची माहिती समोर येत आहे बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील सर्वे नंबर 530 मध्ये वन विभागाची जवळपास 171 हेक्टर जमीन असल्याची माहिती आहे वन विभागाच्या जवळपास 15 एकर जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचे स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत संस्कृती संवर्धन शिक्षण मंडळाने येथील वन विभागाच्या जमीनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष शंकर महाजन यांनी लेखी तक्रारीद्वारे वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती एकीकडे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' चा नारा देत ...