मुख्य सामग्रीवर वगळा

सगरोळीत बजरंग दल भरती आभियानास उत्सुर्फत प्रतिसाद

सगरोळीत बजरंग दल भरती आभियानास उत्सुर्फत प्रतिसाद
तालुका प्रतिनिधी 
बिलोली- देविदास कोंडलाडे
दि.22 नोव्हेंबर रोजी बिलोली तालुक्यातील सगरोळी विश्व हिंदू परिषद - बजरंग दल भरती आभियानास मराठवाड्यात प्रारंभ झाला असून या आभियानास दि.19 नोव्हें ते 6 डिंसे 2017 पर्यत चालणार आहे.तरी सगरोळीत आभियानास प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहीती विहिप धर्म प्रसार जिल्हा प्रमुख विठ्ठल तुकडेकर यांनी दिली.
प्रसिद्धीस दिलेल्या पञकात म्हटले की, 1964 साली विविध पंथ - संप्रदायाच्या धर्माचार्यानी एकत्र येऊन हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी विश्व हिंदू  परिषदेची स्थापना झाली.1980 नंतर सुरू झालेले अयोध्येच्या रामजन्मभुमी मुक्तीचे आंदोलन हा विश्व हिंदू परिषदेच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा होता.त्या दरम्यान अनेक संघर्षाचे प्रसंगही उध्वभू लागले त्या प्रसंगाना सामोरे जाण्यासाठी अर्थातच युवाशक्ती संघटित होणे आवश्यक होते. त्यामुळे रामजन्मभुमी मुक्ती आंदोलनात सहभागी असलेल्या युवकांनी संतांच्या मार्गदर्शनाखाली 1984 साली बजरंग दलाची स्थापना केली.
    अखिल भारतीय अधिवेशनात गाय नही फटने देंगें, देश नही फटने देंगेंच्या जयघोषात बजरंग दलाच्या शाखा देशभर सर्व प्रांतात सुरू करण्याचे ठरले व त्यानुसार महाराष्ट्रातही बजरंग दल कार्यरत असल्याची माहीती देण्यात आली. बजरंग दलाचे कार्यकर्ते गोवंशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजू काम करीत असतात. धर्मांतर थांबविण्याठी काम करत असतात व आपल्या समाजाची सेवा करणे हे आपले कर्तव्यच असल्याचे समजून रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे व विविध कार्यक्रम राबवित असतात देशाच्या आखंतेसाठी, मठ - मंदिराच्या सेवाकामे करीत रक्षणासाठी, युवकांमधे राष्ट्रभक्ती जाणवून भारतमातेला विश्वगुरू बनविण्यासाठी बजरंग दलाच्या कामात सहभागी होतात. या कार्यक्रमात प्रमोदराव  देशमुख व भरडे सावकार यांनी बजरंगदलाच्या विविध कार्यक्रम - उपक्रमात सहभागी कार्यकत्यांना एकत्र  होऊन देश व धर्मा आधारित मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे  व्यंकटराव भरडे,सतिष गौड, आडकेश्वर गोपाळ,शिवसेना उपजिल्हा प्रमुख विश्वनाथ समन पा.यांची उपस्थिती होती.विश्व हिंदू परिषद धर्म प्रसार जिल्हा प्रमुख विठ्ठल तुकडेकर,बजरंग दलाचे जिल्हा संयोजक गजानन पांचाळ, अध्यक्ष - मनोहर देगलूरे, ता.प्रमुख नागु महाराज,बजरंग दल ता. संयोजक अनिल,बजरंग दल शाखा सगरोळी ता.संयोजक भगत ठाकुर, भुमा वांगेवाड, सचिन बोईनवाड,सगरोळीचे युवा कार्यकर्ते स्वरूप जाधव पा.आदी कार्यकर्ते उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल *पहिल्याच टप्प्यात पाच एकर जमीन ताब्यात* बिलोली-  (शिवराज भायनुरे )  बिलोली तालुक्यात नावलौकिक असलेल्या सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून वन विभागाने गुन्हा दाखल करून 5 एकर जमीन ताब्यात घेतली आहे वन विभागाच्या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे संस्कृती संवर्धन मंडळाकडून वन अधिकार्‍यांवर राज्य पातळीवरील तबाव टाकण्याचा प्रकार चालू असल्याची माहिती समोर येत आहे बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील सर्वे नंबर 530 मध्ये वन विभागाची जवळपास 171 हेक्टर जमीन असल्याची माहिती आहे वन विभागाच्या जवळपास 15 एकर जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचे स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत संस्कृती संवर्धन शिक्षण मंडळाने येथील वन विभागाच्या जमीनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष शंकर महाजन यांनी लेखी तक्रारीद्वारे वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती एकीकडे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' चा नारा देत ...

त्यात्या वंचित शेतकऱ्यांसाठी आ. कडुंना दिले निवेदन लेंडी प्रकल्पावर विस्तृत केली चर्चा मुखेड प्रतिनिधी :-०३

            मुखेड  प्रतिनिधी :- बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क                     परीसरातील अनेक गावातील सन२०१६-१७ यामध्ये ४०० च्या जवळपास शेतकऱ्यांनी स्टेट बँक आँफ इंडिया या बँकेत रितसर पध्दतीने प्रधानमंञी पिकविमा योजना भरले होते . पण अध्यापर्यत त्या वंचित शेतकऱ्यांचा पिकविम्याचा लाभ मिळालाच नाही . या वंचित शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटुन आपले व्यथा मांडले , याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दि२४ रोजी लाक्षणिक उपोषण केले. तरी या मुजोर प्रशासनाने कोणतेच उत्तर देत नाही. यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चु कडू यांची भेट घेऊन मुखेड तालुका प्रमुख मन्मथ खंकरे, ता.सरचिटणीस निखील कोयलकोंडेवार , निखील गोगा, अविनाश जाधव यांनी भेट घेऊन विस्तृत चर्चा केली...            मुक्रमाबाद येथील गेल्या ३५ ते ४० वर्षापासुन  रखडीत असलेल्या लेंडी धरणा संदर्भात , अगोदर पुणर्वसन नंतर धरण , व परीसरातील अनेक गावांचे झालेले पुणर्वसन संदर्भात यासह अ...