मुख्य सामग्रीवर वगळा

सगरोळीत बजरंग दल भरती आभियानास उत्सुर्फत प्रतिसाद

सगरोळीत बजरंग दल भरती आभियानास उत्सुर्फत प्रतिसाद
तालुका प्रतिनिधी 
बिलोली- देविदास कोंडलाडे
दि.22 नोव्हेंबर रोजी बिलोली तालुक्यातील सगरोळी विश्व हिंदू परिषद - बजरंग दल भरती आभियानास मराठवाड्यात प्रारंभ झाला असून या आभियानास दि.19 नोव्हें ते 6 डिंसे 2017 पर्यत चालणार आहे.तरी सगरोळीत आभियानास प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहीती विहिप धर्म प्रसार जिल्हा प्रमुख विठ्ठल तुकडेकर यांनी दिली.
प्रसिद्धीस दिलेल्या पञकात म्हटले की, 1964 साली विविध पंथ - संप्रदायाच्या धर्माचार्यानी एकत्र येऊन हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी विश्व हिंदू  परिषदेची स्थापना झाली.1980 नंतर सुरू झालेले अयोध्येच्या रामजन्मभुमी मुक्तीचे आंदोलन हा विश्व हिंदू परिषदेच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा होता.त्या दरम्यान अनेक संघर्षाचे प्रसंगही उध्वभू लागले त्या प्रसंगाना सामोरे जाण्यासाठी अर्थातच युवाशक्ती संघटित होणे आवश्यक होते. त्यामुळे रामजन्मभुमी मुक्ती आंदोलनात सहभागी असलेल्या युवकांनी संतांच्या मार्गदर्शनाखाली 1984 साली बजरंग दलाची स्थापना केली.
    अखिल भारतीय अधिवेशनात गाय नही फटने देंगें, देश नही फटने देंगेंच्या जयघोषात बजरंग दलाच्या शाखा देशभर सर्व प्रांतात सुरू करण्याचे ठरले व त्यानुसार महाराष्ट्रातही बजरंग दल कार्यरत असल्याची माहीती देण्यात आली. बजरंग दलाचे कार्यकर्ते गोवंशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजू काम करीत असतात. धर्मांतर थांबविण्याठी काम करत असतात व आपल्या समाजाची सेवा करणे हे आपले कर्तव्यच असल्याचे समजून रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे व विविध कार्यक्रम राबवित असतात देशाच्या आखंतेसाठी, मठ - मंदिराच्या सेवाकामे करीत रक्षणासाठी, युवकांमधे राष्ट्रभक्ती जाणवून भारतमातेला विश्वगुरू बनविण्यासाठी बजरंग दलाच्या कामात सहभागी होतात. या कार्यक्रमात प्रमोदराव  देशमुख व भरडे सावकार यांनी बजरंगदलाच्या विविध कार्यक्रम - उपक्रमात सहभागी कार्यकत्यांना एकत्र  होऊन देश व धर्मा आधारित मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे  व्यंकटराव भरडे,सतिष गौड, आडकेश्वर गोपाळ,शिवसेना उपजिल्हा प्रमुख विश्वनाथ समन पा.यांची उपस्थिती होती.विश्व हिंदू परिषद धर्म प्रसार जिल्हा प्रमुख विठ्ठल तुकडेकर,बजरंग दलाचे जिल्हा संयोजक गजानन पांचाळ, अध्यक्ष - मनोहर देगलूरे, ता.प्रमुख नागु महाराज,बजरंग दल ता. संयोजक अनिल,बजरंग दल शाखा सगरोळी ता.संयोजक भगत ठाकुर, भुमा वांगेवाड, सचिन बोईनवाड,सगरोळीचे युवा कार्यकर्ते स्वरूप जाधव पा.आदी कार्यकर्ते उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले

* लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले*   * नांदेड :-  वैभव घाटे*  मेसचे बिल मंजूर करण्यासाठी गृहपाल किशोरी अलोने यांना २० हजाराची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. हदगाव येथील समाज कल्याण विभागाच्या मुलीच्या वसतिगृहात त्या कार्यरत असून याच ठिकाणी त्यांना पकडण्यात आले.     हदगाव येथे समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह आहे. येथे ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनी राहत असून किशोरी अलोने या गृहपाल आहेत. वसतिगृहात कार्यरत असलेल्या खानावळीचे बिल काढताना विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरावी भरावी लागते. हि बाब लक्षात घेऊन अलोने यांनी मेस चालकाची अडवणूक करत विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरण्यासाठी २० हजार रुपयाची मागणी केली. यानंतर मेस चालकाने याबाबत नांदेड एसीबी कडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करत आज सकाळी ११ वाजता नांदेड एसीबी ने शासकीय वसतिगृह परिसरात सापळा रचला. यावेळी अलोने या मेस चालकाकडून २० हजाराची लाच स्वीकारताना एसिबी च्या जाळ्यात अडकल्या.     याप्रकरणात हदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा सापळा पोलीस अधीक्षक संजय ला

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.  बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे  गेल्या अनेक दिवसांपासून बिलोली तहसिल कार्यालयातील कर्मचारी निवासी न राहता नांदेड सारख्या शहरात राहून येजा करीत असल्याने तहसिल कार्यालयाचे अनेक कामे वेळेत होत नसल्यामुळे जनतेची कामे खोळंबत असल्याने पत्रकार  संरक्षण समिती  बिलोली च्या वतिने विभागीय अधिकारी बिलोली यांना निवेदन देण्यात आले. बिलोली तहसिल कार्यालयाचे तहसिलदार विनोद गुंडमवार हे बिलोली तहसिल येथे रुजू झाल्यापासून आजतागायत तहसील कार्यालयात नांदेड येथून ये-जा करीत आहेत. याचेच अनुकरण नायब तहसीलदार हे देखील नांदेड येथून ये-जा करित असुन मुख्यालया राहत नसूनही शासनाकडून घरभाडे उचल करीत शासनाची दिशाभूल करीत आहेत याचाच अर्थ उंटावरुन शेळ्या हाकण्यासारखा कारभार सदरील तहसील कर्मच्यार्यांचा झाला आहे. यामुळे तालुक्यातील निराधार, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व बिलोली तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग उद्भवल्यास याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न तहसिलदार ये-जा करीत आसल्या कारणांमुळे अनेक कामे खोळंबत असल्याने जनतेची गैरसोय होत आहे.  बिलोली तालुक्यातील जनतेची गैरसोय दुर क

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध -------------------------------------------------------------  बिलोली     हिंगोली जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला.या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ ता.बिलोलीच्या वतीने जाहिर निषेध करून हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीचे निवेदन तहसिलदार बिलोली यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडे पाठवले आले.    हिंगोलीचे जेष्ठ पञकार व जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर दि.२३ आक्टोंबर रोजी अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक केला.हि घटना घडून ३ दिवस उलटले तरी पोलिसांना आरोपीस पकडण्यात अध्याप अश आले नाही.यामुळे तालुक्यातील पञकारांमध्ये संतापाची लाठ उसळली असून दिलेल्या निवेदनात आपल्या भावना प्रकट करून मा.मुख्यमंञी यांच्याकडे नायब तहसिलदार संजय नागमवाड यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.यावेळी पञकार संघाचे अध्यक्ष  राजेंद्र पा.शिंदे,संघाचे प्रमुख गोविंद मुंडकर,कार्याध्यक्ष बाबूराव इंगळे,उपाध्यक्ष