मुख्य सामग्रीवर वगळा

सगरेळी येथील पशुवैद्यकीय अधिकारी एच .के.तोडे वा-यावर .

सगरेळी येथील पशुवैद्यकीय  अधिकारी एच .के.तोडे वा-यावर . 
बिलोली प्रतिनिधी 

बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे पशुवैद्दकिय दवाखाना असुन या ठिकाणी पशुवैद्दकिय अधीकारी म्हणुन डॉ.एच.के.तोडे याची नियुक्ती करण्यात आली असुन ते गेल्या सहा महिण्या पासुन बेपता असुन सदरिल पशुवैद्दकिय दवाखाना नेहमी बंद राहत असल्यामुळे अनेक समस्याच्या विळाख्यात सापडला आहे.या पशुवैद्दकिय दवाखाण्यात जणावराना वैद्दकिय उपचारासाठी सगरोळीसह ,केसराळी,रामपुर,हिप्परगाथडी,शिंपाळा,दैलतापुर,बोळेगांव या गांवातील शेतकरी जणावराना उपचारासाठी येथे आणतात.माञ येथे पञाचा शेड सुद्धा उपलब्ध नाही उपचार करताना जणावराना बाधण्यासाठी केवळ एक तेही जीर्ण झालेले लोखंडी कठडे आहे.येथे जर उपचार करण्यासाटी जास्त जणावरे आली तर शेतक-याना ताटकळत उभे राहावे लागते एक तर हा पशुवैद्दकिय दवाखाना तेलंगाणा व महाराष्ट सिमेच्या राज्य मार्गावर असुन या पशुवैद्यकिय दवाखान्याची पशुअधिकारी वीना अत्यंत दैनि अवस्था झालीअाहे पशुवैद्किय दवाखान्यावरील टीनसेडला छिद्रे पडली आहेत.तर खिडक्या तुटल्या आहेत.आणि फरर्शीना तडे जात असल्यामुळे फर्शी दबली जाऊन दवाखाण्यातील फर्शी उखडुन जात आहे.तर दवाखाण्याच्या आजु बाजुला कुञ्यानी केलेली घाण व संध्याकाळी मद्दपिना संपुर्ण दवाण्याचा आवार मोकळा राहत आहे तर पशुवैद्दकिय दवाखाणा धुळ खात पडला आहे जर आणखि कांही महीने अशिच अवस्था राहीली तर पशुवैद्दकिय दवाखाण्याच्या इमारतीची  पडझड होण्यास वेळ लागणार नाही.परंतु आज रोजी जणावराणा उपचारासाठी तालुक्याच्या ठिकानी पायपीट करत न्यावे लागत आहे त्यामुळे सगरोळी व परिसरातील शेतक-यांना नाहक ञास सहन करावा लागत आहे त्याचे काय ? अशी संतापाची लाट निर्मान  होत आहे.त्यामुळे जिल्हा पशुवैद्दकिय अधीकारी तथा पदाधिका-यांनी जातीने लक्ष देऊन संबधीत पशुवैद्दकिय अधिकारी यांची चौकी करुन योग्यती कारवाही करण्यात यावी आणि सगरेळी येथील पशुवैद्दकिय दवाखाना पुर्वरत चालु करण्यात यावा आणि लवकरात लवकर पशुवैद्दकिय अधिकारी उपलब्ध करुन देण्यात यावे अशी मागणी सगरोळी व परिसरातील शेतकरी वर्गाकडुन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...
गुत्तेदार व बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात बिलोली तहसील समोर दुगाने चे  अमरण उपोषण सुरु. बिलोली प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत चालू असलेल्या बिलोली ते देगलूर दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे.मात्र हे काम पूर्णपणे बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे.याची कल्पना तीन महिन्यापूर्वी पासून उपोषणकर्ते  संविधान दुगाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला लेखी तक्रार देऊन रस्त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.मात्र या तक्रारी अर्जाला केराची टोपली दाखवत बांधकाम विभागाने संबधित गूत्तेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप दुगाणेनी केला आहे.      एकीकडे खड्डेमुक्त रस्ते  व अपघाताचे प्रमाण कमी करू पाहणाऱ्या महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना आगामी दोन वर्षासाठीे खड्डेमुक्त रस्ता हे अभियान राबवावे लागेल यात शंका नाही.कारण बिलोली- देगलूर हा राज्य महामार्ग असून हा रस्ता आंध्र,तेलंगण व कर्नाटक राज्यांना जोड़न...