वनपाल व वनरक्षक यांच्या बेजबाबदार पणामुळे होत आहे बेसुमार वृक्षांची कत्तल बिलोली प्रतिनिधी (वैभव घाटे)
बिलोली तालुक्यात बेसुमार वृक्षांची कत्तल होत असून, प्रतिदिनी मोठ्या प्रमाणात कत्तल केलेल्या वृक्षांची निर्यात अनेक वाहनांद्वारे शेजारील तेलंगाना राज्यात केल्या जात आहे. सदरील प्रकरणाकडे मात्र वन विभाग हेतू परस्पर दुर्लक्ष करीत असून वन विभागाचा एक कर्मचारी लाकडांची वाहतुक करणा-या वाहनधारकां कडून एंट्री वसूल करत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावरून वनविभागाचा "वृक्षवल्ली आम्हा सोयरे" चा नारा कागदोपत्रीच दिसत असल्याची बाब स्पष्ट होत आहे. वन विभागा मार्फत सन १९८३ पासून तालुक्यात प्लानटेशन वेगवेगळ्या जातीच्या वृक्षाच्या रोपाची लागवड करण्यात आली. परंतु आज पर्यंत तालुक्यातील वनविभागात झाडे दिसत नाही. पण शेतक-यांच्या बांधावर हजारो झाडे दिसतात.बेसुमार वृक्ष तोडीमुळे निसर्गावर होणारा दुष्परिणाम आज देशाला भोगावा लागत आहे. एकेकाळी उन्हाळ्यात ४०% तापमान असतांना आज घाडीला ४५ % वर तापमानावर येवून ठेपले आहे. तालुक्यात बेसुमार वृक्ष तोडीमुळे वन उद्ध्वस्त होत आहेत. वन विभागाकडून एकी कडे " झाडे लावा झाडे जगवा" असा संदेश दिला जात असतांना मात्र तेलंगाना सिमेवरील बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीचा प्रकार निदर्शनास येत आहे. येथून साईजचा माल विक्रीस तेलंगणा राज्यात जात असतांना चेकपोष्ट वरुन जात असतांना अधिकारी बघ्याची भुमीका घेत आहेत. त्यावरून झाडे तोडा... तुम्ही जगा अन् आम्हाला जगवा अशी उलट परिस्थिती वन विभागाच्या बाबतीत पहावयास मिळत आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांची आवश्यकता असून राज्यात कु-हाड बंदीचा नियम लागु करण्याची मागणी होत असून जिल्हा प्रशानाने याकडे गांभिर्याने घेणे गरजेचे आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा