मुख्य सामग्रीवर वगळा

बिलोली सेवा सहकारी सोसायटीच्या संचालिका श्रीमती मुंडकर न्यायालयात जाणार...! बिलोली तालुक्यातील शेतकरी पिक विमा योजनेच्या लाभापासून वंचित -------------------------------------------------------- बिलोली प्रतिनिधी. नागेश इबितवार

 

खरीप हंगामातील मुग,उडिद,सोयाबीन सह अन्य पिकांचे सततच्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका बसला असला तरी पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळेल ही आशा होती.माञ नुकसान होऊनही तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा अद्याप लाभ मिळाला नाही.अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विम्याची रक्कम मिळावी अन्यथा यासाठी सेवा सहकारी सोसायटी बिलोलीच्या जेष्ठ संचालीका श्रीमती भागरथबाई बसवंतराव मुंडकर या न्यायालयात जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

                              या वर्षीच्या सुरूवातीपासूनच कोरोना विषाणूच्या संक्रमनामुळे शासनाने सर्वत्र लाँकडाऊन केले होते.कोरोनाच्या भितीने सर्वसामान्यासह सर्वच उद्योग धंदे भितीने बंद असताना जगाचा पोशिंदा शेतकरी राजा माञ कोरोनाची तमा न बाळगता अगदी पुर्वी प्रमाणे शेती कामात व्यस्त होता.मृग नक्षञातील पावसानंतर शेतकऱ्यांनी आर्थिक संकटात असतानाही उधार उसनवारी करून आपल्या शेतात विविध पिकांच्या बियाणांची पेरणी केली.  शासनाच्या आवाहनानुसार पिक विमा योजनेचे फाँम भरून पिक विमा कंपनीकडे विमा हप्ता जमा ही केला.खरीप हंगामातील मुग,उडीद,सोयाबीन सह अन्य पिके डोलात असताना तालुक्यासह सर्वञ झालेल्या मुसळधार पावसामुळे हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.झालेल्या नुकसानीबाबत महसुल व कृषी विभागाच्यावतीने पंचनामे करण्यात आले.तर पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसानीची माहिती देण्याचे सांगण्यात आले,नुकसानीची विमा कंपनीला माहिती देण्यासाठी कंपनीच्यावतीने एक अँप तयार करण्यात आले होते माञ या अँपचे सर्वर योग्य नसल्यामुळे या अँपचा अनेकांना मानसिक त्रास झाला .मग शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक व ई मेल द्वारे पिकाच्या नुकसानीची विमा कंपनीला सविस्तर माहिती दिली.हाता तोंडाशी आलेले पिक अतिवृष्टीने हिरावल्यानंतर पिक विमा योजनेतुन मिळणाऱ्या रक्कमेचा रब्बी हंगामातील पेरणीला उपयोग होईल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीनेने दगा दिला आहे.रब्बी हंगामाच्या पेरण्या होऊन जवळपास २५ दिवस लोटले असले तरी अध्याप पर्यंत खरीप हंगामातील पिकांच्या झालेल्या नुकसानीचा विमा शेतकऱ्यांना अद्याप प्राप्त झाला नाही. हक्काचे पैसे वेळेवर प्राप्त होत नसतील तर प्रसंगी पिक विमा कंपनी विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती बिलोली येथील सेवा सहकारी सोसायटीच्या जेष्ठ संचालीका श्रीमती भागरथबाई बसवंतराव मुंडकर यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल *पहिल्याच टप्प्यात पाच एकर जमीन ताब्यात* बिलोली-  (शिवराज भायनुरे )  बिलोली तालुक्यात नावलौकिक असलेल्या सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून वन विभागाने गुन्हा दाखल करून 5 एकर जमीन ताब्यात घेतली आहे वन विभागाच्या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे संस्कृती संवर्धन मंडळाकडून वन अधिकार्‍यांवर राज्य पातळीवरील तबाव टाकण्याचा प्रकार चालू असल्याची माहिती समोर येत आहे बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील सर्वे नंबर 530 मध्ये वन विभागाची जवळपास 171 हेक्टर जमीन असल्याची माहिती आहे वन विभागाच्या जवळपास 15 एकर जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचे स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत संस्कृती संवर्धन शिक्षण मंडळाने येथील वन विभागाच्या जमीनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष शंकर महाजन यांनी लेखी तक्रारीद्वारे वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती एकीकडे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' चा नारा देत ...