बिलोली सेवा सहकारी सोसायटीच्या संचालिका श्रीमती मुंडकर न्यायालयात जाणार...! बिलोली तालुक्यातील शेतकरी पिक विमा योजनेच्या लाभापासून वंचित -------------------------------------------------------- बिलोली प्रतिनिधी. नागेश इबितवार
खरीप हंगामातील मुग,उडिद,सोयाबीन सह अन्य पिकांचे सततच्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका बसला असला तरी पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळेल ही आशा होती.माञ नुकसान होऊनही तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा अद्याप लाभ मिळाला नाही.अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विम्याची रक्कम मिळावी अन्यथा यासाठी सेवा सहकारी सोसायटी बिलोलीच्या जेष्ठ संचालीका श्रीमती भागरथबाई बसवंतराव मुंडकर या न्यायालयात जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
या वर्षीच्या सुरूवातीपासूनच कोरोना विषाणूच्या संक्रमनामुळे शासनाने सर्वत्र लाँकडाऊन केले होते.कोरोनाच्या भितीने सर्वसामान्यासह सर्वच उद्योग धंदे भितीने बंद असताना जगाचा पोशिंदा शेतकरी राजा माञ कोरोनाची तमा न बाळगता अगदी पुर्वी प्रमाणे शेती कामात व्यस्त होता.मृग नक्षञातील पावसानंतर शेतकऱ्यांनी आर्थिक संकटात असतानाही उधार उसनवारी करून आपल्या शेतात विविध पिकांच्या बियाणांची पेरणी केली. शासनाच्या आवाहनानुसार पिक विमा योजनेचे फाँम भरून पिक विमा कंपनीकडे विमा हप्ता जमा ही केला.खरीप हंगामातील मुग,उडीद,सोयाबीन सह अन्य पिके डोलात असताना तालुक्यासह सर्वञ झालेल्या मुसळधार पावसामुळे हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.झालेल्या नुकसानीबाबत महसुल व कृषी विभागाच्यावतीने पंचनामे करण्यात आले.तर पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसानीची माहिती देण्याचे सांगण्यात आले,नुकसानीची विमा कंपनीला माहिती देण्यासाठी कंपनीच्यावतीने एक अँप तयार करण्यात आले होते माञ या अँपचे सर्वर योग्य नसल्यामुळे या अँपचा अनेकांना मानसिक त्रास झाला .मग शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक व ई मेल द्वारे पिकाच्या नुकसानीची विमा कंपनीला सविस्तर माहिती दिली.हाता तोंडाशी आलेले पिक अतिवृष्टीने हिरावल्यानंतर पिक विमा योजनेतुन मिळणाऱ्या रक्कमेचा रब्बी हंगामातील पेरणीला उपयोग होईल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीनेने दगा दिला आहे.रब्बी हंगामाच्या पेरण्या होऊन जवळपास २५ दिवस लोटले असले तरी अध्याप पर्यंत खरीप हंगामातील पिकांच्या झालेल्या नुकसानीचा विमा शेतकऱ्यांना अद्याप प्राप्त झाला नाही. हक्काचे पैसे वेळेवर प्राप्त होत नसतील तर प्रसंगी पिक विमा कंपनी विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती बिलोली येथील सेवा सहकारी सोसायटीच्या जेष्ठ संचालीका श्रीमती भागरथबाई बसवंतराव मुंडकर यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा