मुख्य सामग्रीवर वगळा

बिलोली सेवा सहकारी सोसायटीच्या संचालिका श्रीमती मुंडकर न्यायालयात जाणार...! बिलोली तालुक्यातील शेतकरी पिक विमा योजनेच्या लाभापासून वंचित -------------------------------------------------------- बिलोली प्रतिनिधी. नागेश इबितवार

 

खरीप हंगामातील मुग,उडिद,सोयाबीन सह अन्य पिकांचे सततच्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका बसला असला तरी पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळेल ही आशा होती.माञ नुकसान होऊनही तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा अद्याप लाभ मिळाला नाही.अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विम्याची रक्कम मिळावी अन्यथा यासाठी सेवा सहकारी सोसायटी बिलोलीच्या जेष्ठ संचालीका श्रीमती भागरथबाई बसवंतराव मुंडकर या न्यायालयात जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

                              या वर्षीच्या सुरूवातीपासूनच कोरोना विषाणूच्या संक्रमनामुळे शासनाने सर्वत्र लाँकडाऊन केले होते.कोरोनाच्या भितीने सर्वसामान्यासह सर्वच उद्योग धंदे भितीने बंद असताना जगाचा पोशिंदा शेतकरी राजा माञ कोरोनाची तमा न बाळगता अगदी पुर्वी प्रमाणे शेती कामात व्यस्त होता.मृग नक्षञातील पावसानंतर शेतकऱ्यांनी आर्थिक संकटात असतानाही उधार उसनवारी करून आपल्या शेतात विविध पिकांच्या बियाणांची पेरणी केली.  शासनाच्या आवाहनानुसार पिक विमा योजनेचे फाँम भरून पिक विमा कंपनीकडे विमा हप्ता जमा ही केला.खरीप हंगामातील मुग,उडीद,सोयाबीन सह अन्य पिके डोलात असताना तालुक्यासह सर्वञ झालेल्या मुसळधार पावसामुळे हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.झालेल्या नुकसानीबाबत महसुल व कृषी विभागाच्यावतीने पंचनामे करण्यात आले.तर पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसानीची माहिती देण्याचे सांगण्यात आले,नुकसानीची विमा कंपनीला माहिती देण्यासाठी कंपनीच्यावतीने एक अँप तयार करण्यात आले होते माञ या अँपचे सर्वर योग्य नसल्यामुळे या अँपचा अनेकांना मानसिक त्रास झाला .मग शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक व ई मेल द्वारे पिकाच्या नुकसानीची विमा कंपनीला सविस्तर माहिती दिली.हाता तोंडाशी आलेले पिक अतिवृष्टीने हिरावल्यानंतर पिक विमा योजनेतुन मिळणाऱ्या रक्कमेचा रब्बी हंगामातील पेरणीला उपयोग होईल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीनेने दगा दिला आहे.रब्बी हंगामाच्या पेरण्या होऊन जवळपास २५ दिवस लोटले असले तरी अध्याप पर्यंत खरीप हंगामातील पिकांच्या झालेल्या नुकसानीचा विमा शेतकऱ्यांना अद्याप प्राप्त झाला नाही. हक्काचे पैसे वेळेवर प्राप्त होत नसतील तर प्रसंगी पिक विमा कंपनी विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती बिलोली येथील सेवा सहकारी सोसायटीच्या जेष्ठ संचालीका श्रीमती भागरथबाई बसवंतराव मुंडकर यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.  बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे  गेल्या अनेक दिवसांपासून बिलोली तहसिल कार्यालयातील कर्मचारी निवासी न राहता नांदेड सारख्या शहरात राहून येजा करीत असल्याने तहसिल कार्यालयाचे अनेक कामे वेळेत होत नसल्यामुळे जनतेची कामे खोळंबत असल्याने पत्रकार  संरक्षण समिती  बिलोली च्या वतिने विभागीय अधिकारी बिलोली यांना निवेदन देण्यात आले. बिलोली तहसिल कार्यालयाचे तहसिलदार विनोद गुंडमवार हे बिलोली तहसिल येथे रुजू झाल्यापासून आजतागायत तहसील कार्यालयात नांदेड येथून ये-जा करीत आहेत. याचेच अनुकरण नायब तहसीलदार हे देखील नांदेड येथून ये-जा करित असुन मुख्यालया राहत नसूनही शासनाकडून घरभाडे उचल करीत शासनाची दिशाभूल करीत आहेत याचाच अर्थ उंटावरुन शेळ्या हाकण्यासारखा कारभार सदरील तहसील कर्मच्यार्यांचा झाला आहे. यामुळे तालुक्यातील निराधार, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व बिलोली तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग उद्भवल्यास याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न तहसिलदार ये-जा करीत आसल्या कारणांमुळे अनेक कामे खोळंबत असल्याने जनतेची गैरसोय होत आहे.  बिलोली तालुक्यातील जनतेची गैरसोय दुर क

*लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले

* लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले*   * नांदेड :-  वैभव घाटे*  मेसचे बिल मंजूर करण्यासाठी गृहपाल किशोरी अलोने यांना २० हजाराची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. हदगाव येथील समाज कल्याण विभागाच्या मुलीच्या वसतिगृहात त्या कार्यरत असून याच ठिकाणी त्यांना पकडण्यात आले.     हदगाव येथे समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह आहे. येथे ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनी राहत असून किशोरी अलोने या गृहपाल आहेत. वसतिगृहात कार्यरत असलेल्या खानावळीचे बिल काढताना विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरावी भरावी लागते. हि बाब लक्षात घेऊन अलोने यांनी मेस चालकाची अडवणूक करत विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरण्यासाठी २० हजार रुपयाची मागणी केली. यानंतर मेस चालकाने याबाबत नांदेड एसीबी कडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करत आज सकाळी ११ वाजता नांदेड एसीबी ने शासकीय वसतिगृह परिसरात सापळा रचला. यावेळी अलोने या मेस चालकाकडून २० हजाराची लाच स्वीकारताना एसिबी च्या जाळ्यात अडकल्या.     याप्रकरणात हदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा सापळा पोलीस अधीक्षक संजय ला

नागरिकांनो महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल ॲपचा वापर करा - धबडगे

बिलोली :- वैभव घाटे ‘महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल ॲप’ मुळे सामान्य नागरिक अधिक सक्षम तर पोलीस प्रशासनास काम करण्यास मोठी मदत मिळणार आहे त्यामुळे नागरिकांनी आपल्या स्मार्ट फोनमध्ये हा अँप डाऊनलोड करून या अँपच्या माध्यमातून गुन्हे विषयक कोणताही रेकार्ड ऑनलाईन पाहणे, ऑनलाईन तक्रार दाखल करणे, तपासाची स्थिती जाणून घेणे या बाबी सहज उपलब्ध होणार आहेत त्यामुळे या अँप चा मोठ्या प्रमाणात प्रसार करावे असे आदेश पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मिना यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय  पोलिस कार्यालय व पोलिस ठाणे यांना पत्रकाद्वारे कळविले होते. पोलिस अधिक्षकांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत बिलोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे व पोलिस अधिक्षक यांनी या अँपचे जास्तीतजास्त नागरिकांनी "महाराष्ट्र पोलिस सिटीझन पोर्टल अँप" चा वापर करावे असे अवाहन केले आहे. महाराष्ट्रात गुन्ह्यांचा आलेख कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन वेगवेगळया उपाययोजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे मोबाईल ॲप पोलीस विभागाने विकसित केले आहे. महाराष्ट्र सारख्या मोठया राज्यासाठी हे काम अतिशय कठीण होते. मात्र पोलीस विभागाच