मुख्य सामग्रीवर वगळा

**आमदार अंतापुरकर पाहा ह्या रस्ताचे बेहाल**


बिलोली प्रतिनिधी - नागेश इबितवार 

बिलोली तालुक्यातील मौजे. अंजनी ते बामणी  रस्त्याची अतिशय दुरवस्था झालेली असून मागील पाच वर्षा पासून अंजनी फाटा ते बामणी फाट्यापर्यंत  कंट्रक्सनचे काम चालू असुन अंजनी फाटा ते अंजनी पर्यंत डांबरी करणाचे काम झाले आहे परंतु ते काम अतिशय निकृष्ट  दर्जाचे झाले आहे।  सदरील कामाचे गुतेदार स्वत:इंजिनिअर असलेल्याने सहा महिन्यातच ते काम उखडून गिटी वर निघाली आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने का पाटफिरविले आहे असा प्रश्न जनता उपस्थित करत आहे। तसेच अंजनी ते बामणी पर्यंत रोडवर पावसाळ्यात गिटी व मुरुम थातुर माथुर करून टाकण्यात आले होते परंतु ते गिटी उकळून निघाली आहे। त्यामुळे नवतरुण व तालुक्याला जाणाऱ्या प्रवाशांना काटेवरची कसरत व जीवघेणा प्रवास करावा लागत आहे अंजनी ते बामणी पर्यंत गिटी आजूबाजूला पसरल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन  करावा लागतोपोखर्णी फाटा ते बिलोली रस्त्याचे धुळीचे साम्राज्य मोठ्याप्राणावर पसरले असल्याने नागरिकांसह वाहन चालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.बिलोली तालुक्यातील पोखर्णी फाटा ते बिलोली हा ३ किलोमीटरचा अंतर असून या रस्त्याचे काम झाले नसल्यामुळे खड्यात रस्ता शोधावे लागत आहे। गुतेदार व इंजिनिअर यांच्या हातमिळवणी केल्याने  या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे यावर कोणत्याच  प्रकारची व्यवस्थितरीत्या मुरूम व गिटीचा पुरेपूर वापर करण्यात आले नाही।  लाल माती मिश्रीत मुरूम आणि गिटीचा वापर करून  रस्त्याची दबई करण्यात आली असल्याने सद्या या मार्गावर रस्त्यात खडे व खड्यात रस्ता शोधावा लागत आहे त्यामुळे अनावधानाणे या रस्त्यावरील होणारी जिवीत हानी टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग बिलोली यांनी ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी जनतेला मधुन होत आहे  रोडवरील  वाहनांमुळे  मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूला धुळीचे साम्राज्य  पसरल्याने रस्त्यावरील   दुचकीस्वार यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे।

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.  बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे  गेल्या अनेक दिवसांपासून बिलोली तहसिल कार्यालयातील कर्मचारी निवासी न राहता नांदेड सारख्या शहरात राहून येजा करीत असल्याने तहसिल कार्यालयाचे अनेक कामे वेळेत होत नसल्यामुळे जनतेची कामे खोळंबत असल्याने पत्रकार  संरक्षण समिती  बिलोली च्या वतिने विभागीय अधिकारी बिलोली यांना निवेदन देण्यात आले. बिलोली तहसिल कार्यालयाचे तहसिलदार विनोद गुंडमवार हे बिलोली तहसिल येथे रुजू झाल्यापासून आजतागायत तहसील कार्यालयात नांदेड येथून ये-जा करीत आहेत. याचेच अनुकरण नायब तहसीलदार हे देखील नांदेड येथून ये-जा करित असुन मुख्यालया राहत नसूनही शासनाकडून घरभाडे उचल करीत शासनाची दिशाभूल करीत आहेत याचाच अर्थ उंटावरुन शेळ्या हाकण्यासारखा कारभार सदरील तहसील कर्मच्यार्यांचा झाला आहे. यामुळे तालुक्यातील निराधार, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व बिलोली तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग उद्भवल्यास याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न तहसिलदार ये-जा करीत आसल्या कारणांमुळे अनेक कामे खोळंबत असल्याने जनतेची गैरसोय होत आहे.  बिलोली तालुक्यातील जनतेची गैरसोय दुर क

*लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले

* लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले*   * नांदेड :-  वैभव घाटे*  मेसचे बिल मंजूर करण्यासाठी गृहपाल किशोरी अलोने यांना २० हजाराची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. हदगाव येथील समाज कल्याण विभागाच्या मुलीच्या वसतिगृहात त्या कार्यरत असून याच ठिकाणी त्यांना पकडण्यात आले.     हदगाव येथे समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह आहे. येथे ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनी राहत असून किशोरी अलोने या गृहपाल आहेत. वसतिगृहात कार्यरत असलेल्या खानावळीचे बिल काढताना विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरावी भरावी लागते. हि बाब लक्षात घेऊन अलोने यांनी मेस चालकाची अडवणूक करत विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरण्यासाठी २० हजार रुपयाची मागणी केली. यानंतर मेस चालकाने याबाबत नांदेड एसीबी कडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करत आज सकाळी ११ वाजता नांदेड एसीबी ने शासकीय वसतिगृह परिसरात सापळा रचला. यावेळी अलोने या मेस चालकाकडून २० हजाराची लाच स्वीकारताना एसिबी च्या जाळ्यात अडकल्या.     याप्रकरणात हदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा सापळा पोलीस अधीक्षक संजय ला

नागरिकांनो महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल ॲपचा वापर करा - धबडगे

बिलोली :- वैभव घाटे ‘महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल ॲप’ मुळे सामान्य नागरिक अधिक सक्षम तर पोलीस प्रशासनास काम करण्यास मोठी मदत मिळणार आहे त्यामुळे नागरिकांनी आपल्या स्मार्ट फोनमध्ये हा अँप डाऊनलोड करून या अँपच्या माध्यमातून गुन्हे विषयक कोणताही रेकार्ड ऑनलाईन पाहणे, ऑनलाईन तक्रार दाखल करणे, तपासाची स्थिती जाणून घेणे या बाबी सहज उपलब्ध होणार आहेत त्यामुळे या अँप चा मोठ्या प्रमाणात प्रसार करावे असे आदेश पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मिना यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय  पोलिस कार्यालय व पोलिस ठाणे यांना पत्रकाद्वारे कळविले होते. पोलिस अधिक्षकांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत बिलोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे व पोलिस अधिक्षक यांनी या अँपचे जास्तीतजास्त नागरिकांनी "महाराष्ट्र पोलिस सिटीझन पोर्टल अँप" चा वापर करावे असे अवाहन केले आहे. महाराष्ट्रात गुन्ह्यांचा आलेख कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन वेगवेगळया उपाययोजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे मोबाईल ॲप पोलीस विभागाने विकसित केले आहे. महाराष्ट्र सारख्या मोठया राज्यासाठी हे काम अतिशय कठीण होते. मात्र पोलीस विभागाच