मुख्य सामग्रीवर वगळा

**आमदार अंतापुरकर पाहा ह्या रस्ताचे बेहाल**


बिलोली प्रतिनिधी - नागेश इबितवार 

बिलोली तालुक्यातील मौजे. अंजनी ते बामणी  रस्त्याची अतिशय दुरवस्था झालेली असून मागील पाच वर्षा पासून अंजनी फाटा ते बामणी फाट्यापर्यंत  कंट्रक्सनचे काम चालू असुन अंजनी फाटा ते अंजनी पर्यंत डांबरी करणाचे काम झाले आहे परंतु ते काम अतिशय निकृष्ट  दर्जाचे झाले आहे।  सदरील कामाचे गुतेदार स्वत:इंजिनिअर असलेल्याने सहा महिन्यातच ते काम उखडून गिटी वर निघाली आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने का पाटफिरविले आहे असा प्रश्न जनता उपस्थित करत आहे। तसेच अंजनी ते बामणी पर्यंत रोडवर पावसाळ्यात गिटी व मुरुम थातुर माथुर करून टाकण्यात आले होते परंतु ते गिटी उकळून निघाली आहे। त्यामुळे नवतरुण व तालुक्याला जाणाऱ्या प्रवाशांना काटेवरची कसरत व जीवघेणा प्रवास करावा लागत आहे अंजनी ते बामणी पर्यंत गिटी आजूबाजूला पसरल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन  करावा लागतोपोखर्णी फाटा ते बिलोली रस्त्याचे धुळीचे साम्राज्य मोठ्याप्राणावर पसरले असल्याने नागरिकांसह वाहन चालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.बिलोली तालुक्यातील पोखर्णी फाटा ते बिलोली हा ३ किलोमीटरचा अंतर असून या रस्त्याचे काम झाले नसल्यामुळे खड्यात रस्ता शोधावे लागत आहे। गुतेदार व इंजिनिअर यांच्या हातमिळवणी केल्याने  या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे यावर कोणत्याच  प्रकारची व्यवस्थितरीत्या मुरूम व गिटीचा पुरेपूर वापर करण्यात आले नाही।  लाल माती मिश्रीत मुरूम आणि गिटीचा वापर करून  रस्त्याची दबई करण्यात आली असल्याने सद्या या मार्गावर रस्त्यात खडे व खड्यात रस्ता शोधावा लागत आहे त्यामुळे अनावधानाणे या रस्त्यावरील होणारी जिवीत हानी टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग बिलोली यांनी ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी जनतेला मधुन होत आहे  रोडवरील  वाहनांमुळे  मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूला धुळीचे साम्राज्य  पसरल्याने रस्त्यावरील   दुचकीस्वार यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे।

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल *पहिल्याच टप्प्यात पाच एकर जमीन ताब्यात* बिलोली-  (शिवराज भायनुरे )  बिलोली तालुक्यात नावलौकिक असलेल्या सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून वन विभागाने गुन्हा दाखल करून 5 एकर जमीन ताब्यात घेतली आहे वन विभागाच्या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे संस्कृती संवर्धन मंडळाकडून वन अधिकार्‍यांवर राज्य पातळीवरील तबाव टाकण्याचा प्रकार चालू असल्याची माहिती समोर येत आहे बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील सर्वे नंबर 530 मध्ये वन विभागाची जवळपास 171 हेक्टर जमीन असल्याची माहिती आहे वन विभागाच्या जवळपास 15 एकर जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचे स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत संस्कृती संवर्धन शिक्षण मंडळाने येथील वन विभागाच्या जमीनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष शंकर महाजन यांनी लेखी तक्रारीद्वारे वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती एकीकडे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' चा नारा देत ...

त्यात्या वंचित शेतकऱ्यांसाठी आ. कडुंना दिले निवेदन लेंडी प्रकल्पावर विस्तृत केली चर्चा मुखेड प्रतिनिधी :-०३

            मुखेड  प्रतिनिधी :- बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क                     परीसरातील अनेक गावातील सन२०१६-१७ यामध्ये ४०० च्या जवळपास शेतकऱ्यांनी स्टेट बँक आँफ इंडिया या बँकेत रितसर पध्दतीने प्रधानमंञी पिकविमा योजना भरले होते . पण अध्यापर्यत त्या वंचित शेतकऱ्यांचा पिकविम्याचा लाभ मिळालाच नाही . या वंचित शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटुन आपले व्यथा मांडले , याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दि२४ रोजी लाक्षणिक उपोषण केले. तरी या मुजोर प्रशासनाने कोणतेच उत्तर देत नाही. यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चु कडू यांची भेट घेऊन मुखेड तालुका प्रमुख मन्मथ खंकरे, ता.सरचिटणीस निखील कोयलकोंडेवार , निखील गोगा, अविनाश जाधव यांनी भेट घेऊन विस्तृत चर्चा केली...            मुक्रमाबाद येथील गेल्या ३५ ते ४० वर्षापासुन  रखडीत असलेल्या लेंडी धरणा संदर्भात , अगोदर पुणर्वसन नंतर धरण , व परीसरातील अनेक गावांचे झालेले पुणर्वसन संदर्भात यासह अ...