बिलोली प्रतिनिधी - नागेश इबितवार
बिलोली तालुक्यातील मौजे. अंजनी ते बामणी रस्त्याची अतिशय दुरवस्था झालेली असून मागील पाच वर्षा पासून अंजनी फाटा ते बामणी फाट्यापर्यंत कंट्रक्सनचे काम चालू असुन अंजनी फाटा ते अंजनी पर्यंत डांबरी करणाचे काम झाले आहे परंतु ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे। सदरील कामाचे गुतेदार स्वत:इंजिनिअर असलेल्याने सहा महिन्यातच ते काम उखडून गिटी वर निघाली आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने का पाटफिरविले आहे असा प्रश्न जनता उपस्थित करत आहे। तसेच अंजनी ते बामणी पर्यंत रोडवर पावसाळ्यात गिटी व मुरुम थातुर माथुर करून टाकण्यात आले होते परंतु ते गिटी उकळून निघाली आहे। त्यामुळे नवतरुण व तालुक्याला जाणाऱ्या प्रवाशांना काटेवरची कसरत व जीवघेणा प्रवास करावा लागत आहे अंजनी ते बामणी पर्यंत गिटी आजूबाजूला पसरल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोपोखर्णी फाटा ते बिलोली रस्त्याचे धुळीचे साम्राज्य मोठ्याप्राणावर पसरले असल्याने नागरिकांसह वाहन चालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.बिलोली तालुक्यातील पोखर्णी फाटा ते बिलोली हा ३ किलोमीटरचा अंतर असून या रस्त्याचे काम झाले नसल्यामुळे खड्यात रस्ता शोधावे लागत आहे। गुतेदार व इंजिनिअर यांच्या हातमिळवणी केल्याने या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे यावर कोणत्याच प्रकारची व्यवस्थितरीत्या मुरूम व गिटीचा पुरेपूर वापर करण्यात आले नाही। लाल माती मिश्रीत मुरूम आणि गिटीचा वापर करून रस्त्याची दबई करण्यात आली असल्याने सद्या या मार्गावर रस्त्यात खडे व खड्यात रस्ता शोधावा लागत आहे त्यामुळे अनावधानाणे या रस्त्यावरील होणारी जिवीत हानी टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग बिलोली यांनी ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी जनतेला मधुन होत आहे रोडवरील वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूला धुळीचे साम्राज्य पसरल्याने रस्त्यावरील दुचकीस्वार यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा