मुख्य सामग्रीवर वगळा

बिलोलीत भारीपच्या वतीने संविधान गौरव दिन साजरा. संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून डॉ.बाबासाहेबांना अभिवादन.....!





बिलोली प्रतिनिधी 
ज्यांना वर्गात बसून शिकण्याची मुभा नव्हती ज्यांच्या सावलीचाही विँटाळ मानला जायचा त्याच युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी भारताला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान 2 वर्ष 11 महीने आणि 17 दिवसाच्या कालावधीत पूर्ण करून 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला बहाल केला.तोच दिवस संविधान गौरव दिन म्हणून संपूर्ण देशभरात साजरा करून डॉ.बाबासाहेबांना अभिवादन या दिवशी करतात.
  यावेळी जाणीव पूर्वक प्रशासनातील पदाधिकाऱ्याना पाचारण करण्यात आले होते.यावेळी पोलिस निरीक्षक मा.भगवान धबडगे,सपोनी सोमनाथ शिंदे,नायब तहसीलदार मा.मामिड्वार यांना पाचारण करण्यात आले होते.कारण डॉ.बाबासाहेब म्हणाले होते की,संविधान कितीही चांगले असो ते राबवनाऱ्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक असतील तर संविधान चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही.पण या उलट जर संविधान राबवणारे जर अप्रामाणिक असतील तर वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही.म्हणून प्रशासनातील अधिकारी व सत्ताधारी लोकाना पाचारण भारीप बहुजन महासंघ ता.बिलोलीने केले होते.
     या कार्यक्रमासाठि भारीपचे जिल्हा प्रवक्ता डॉ.प्रा.बलभीम वाघमारे,बिलोलीचे माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे,जि.सचिव संजय जाधव,प्रा.धम्मपाल जाधव,ता.अध्यक्ष धम्मदीप गावंडे,वारणेचा वाघ संघटनेचे संविधान दुगाने,ताणूबाई साळवे पत्रकार संघाचे सं.अध्यक्ष वल्लीओद्दीन फारुखी,नगरसेवक आजमद चाउस,तेलंगणचे पांडु अण्णा,पत्रकार रत्नाकर जाधव,भारतीय बौद्ध महासभेचे ता.अध्यक्ष बालाजी नरहरे,लक्ष्मण जाधव,बौद्धाचार्य गौलवाड सर,प्रा.मारोती भदरगे,संपादक यादव लोकडे,सम्राटचे ता.प्रतिनिधि भास्कर भेदेकर,पाशा पटेल ,शहर अध्यक्ष संघपाल जाधव,किशोर पोवाडे,मुन्ना पोवाडे,धम्मपाल भुसावळे, सुनिल प्रचंड,कुणाल सोनकांबळे,भारीप धर्माबादचे गंगाधर हानमंत्ते,शिवाजी विचारे,माधव बावलगावे,व आदि संविधान प्रेमी व सामाजिक कार्यकर्ते,व पत्रकार बांधव यावेळी उपस्तीथ होते.मान्यवर व प्रमुख पाहून्याच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तद्नंतर प्रा.डॉ बलभीम वाघमारे,माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे,पाशाभाई पटेल यांनी मनोगत व्यक्त केले.
  या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्तावीक  संविधान दुगाने यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.धम्मपाल जाधव केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले

* लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले*   * नांदेड :-  वैभव घाटे*  मेसचे बिल मंजूर करण्यासाठी गृहपाल किशोरी अलोने यांना २० हजाराची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. हदगाव येथील समाज कल्याण विभागाच्या मुलीच्या वसतिगृहात त्या कार्यरत असून याच ठिकाणी त्यांना पकडण्यात आले.     हदगाव येथे समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह आहे. येथे ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनी राहत असून किशोरी अलोने या गृहपाल आहेत. वसतिगृहात कार्यरत असलेल्या खानावळीचे बिल काढताना विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरावी भरावी लागते. हि बाब लक्षात घेऊन अलोने यांनी मेस चालकाची अडवणूक करत विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरण्यासाठी २० हजार रुपयाची मागणी केली. यानंतर मेस चालकाने याबाबत नांदेड एसीबी कडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करत आज सकाळी ११ वाजता नांदेड एसीबी ने शासकीय वसतिगृह परिसरात सापळा रचला. यावेळी अलोने या मेस चालकाकडून २० हजाराची लाच स्वीकारताना एसिबी च्या जाळ्यात अडकल्या.     याप्रकरणात हदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा सापळा पोलीस अधीक्षक संजय ला

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.  बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे  गेल्या अनेक दिवसांपासून बिलोली तहसिल कार्यालयातील कर्मचारी निवासी न राहता नांदेड सारख्या शहरात राहून येजा करीत असल्याने तहसिल कार्यालयाचे अनेक कामे वेळेत होत नसल्यामुळे जनतेची कामे खोळंबत असल्याने पत्रकार  संरक्षण समिती  बिलोली च्या वतिने विभागीय अधिकारी बिलोली यांना निवेदन देण्यात आले. बिलोली तहसिल कार्यालयाचे तहसिलदार विनोद गुंडमवार हे बिलोली तहसिल येथे रुजू झाल्यापासून आजतागायत तहसील कार्यालयात नांदेड येथून ये-जा करीत आहेत. याचेच अनुकरण नायब तहसीलदार हे देखील नांदेड येथून ये-जा करित असुन मुख्यालया राहत नसूनही शासनाकडून घरभाडे उचल करीत शासनाची दिशाभूल करीत आहेत याचाच अर्थ उंटावरुन शेळ्या हाकण्यासारखा कारभार सदरील तहसील कर्मच्यार्यांचा झाला आहे. यामुळे तालुक्यातील निराधार, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व बिलोली तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग उद्भवल्यास याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न तहसिलदार ये-जा करीत आसल्या कारणांमुळे अनेक कामे खोळंबत असल्याने जनतेची गैरसोय होत आहे.  बिलोली तालुक्यातील जनतेची गैरसोय दुर क

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध -------------------------------------------------------------  बिलोली     हिंगोली जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला.या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ ता.बिलोलीच्या वतीने जाहिर निषेध करून हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीचे निवेदन तहसिलदार बिलोली यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडे पाठवले आले.    हिंगोलीचे जेष्ठ पञकार व जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर दि.२३ आक्टोंबर रोजी अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक केला.हि घटना घडून ३ दिवस उलटले तरी पोलिसांना आरोपीस पकडण्यात अध्याप अश आले नाही.यामुळे तालुक्यातील पञकारांमध्ये संतापाची लाठ उसळली असून दिलेल्या निवेदनात आपल्या भावना प्रकट करून मा.मुख्यमंञी यांच्याकडे नायब तहसिलदार संजय नागमवाड यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.यावेळी पञकार संघाचे अध्यक्ष  राजेंद्र पा.शिंदे,संघाचे प्रमुख गोविंद मुंडकर,कार्याध्यक्ष बाबूराव इंगळे,उपाध्यक्ष