बिलोलीत भारीपच्या वतीने संविधान गौरव दिन साजरा. संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून डॉ.बाबासाहेबांना अभिवादन.....!
बिलोली प्रतिनिधी
ज्यांना वर्गात बसून शिकण्याची मुभा नव्हती ज्यांच्या सावलीचाही विँटाळ मानला जायचा त्याच युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी भारताला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान 2 वर्ष 11 महीने आणि 17 दिवसाच्या कालावधीत पूर्ण करून 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला बहाल केला.तोच दिवस संविधान गौरव दिन म्हणून संपूर्ण देशभरात साजरा करून डॉ.बाबासाहेबांना अभिवादन या दिवशी करतात.
यावेळी जाणीव पूर्वक प्रशासनातील पदाधिकाऱ्याना पाचारण करण्यात आले होते.यावेळी पोलिस निरीक्षक मा.भगवान धबडगे,सपोनी सोमनाथ शिंदे,नायब तहसीलदार मा.मामिड्वार यांना पाचारण करण्यात आले होते.कारण डॉ.बाबासाहेब म्हणाले होते की,संविधान कितीही चांगले असो ते राबवनाऱ्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक असतील तर संविधान चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही.पण या उलट जर संविधान राबवणारे जर अप्रामाणिक असतील तर वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही.म्हणून प्रशासनातील अधिकारी व सत्ताधारी लोकाना पाचारण भारीप बहुजन महासंघ ता.बिलोलीने केले होते.
या कार्यक्रमासाठि भारीपचे जिल्हा प्रवक्ता डॉ.प्रा.बलभीम वाघमारे,बिलोलीचे माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे,जि.सचिव संजय जाधव,प्रा.धम्मपाल जाधव,ता.अध्यक्ष धम्मदीप गावंडे,वारणेचा वाघ संघटनेचे संविधान दुगाने,ताणूबाई साळवे पत्रकार संघाचे सं.अध्यक्ष वल्लीओद्दीन फारुखी,नगरसेवक आजमद चाउस,तेलंगणचे पांडु अण्णा,पत्रकार रत्नाकर जाधव,भारतीय बौद्ध महासभेचे ता.अध्यक्ष बालाजी नरहरे,लक्ष्मण जाधव,बौद्धाचार्य गौलवाड सर,प्रा.मारोती भदरगे,संपादक यादव लोकडे,सम्राटचे ता.प्रतिनिधि भास्कर भेदेकर,पाशा पटेल ,शहर अध्यक्ष संघपाल जाधव,किशोर पोवाडे,मुन्ना पोवाडे,धम्मपाल भुसावळे, सुनिल प्रचंड,कुणाल सोनकांबळे,भारीप धर्माबादचे गंगाधर हानमंत्ते,शिवाजी विचारे,माधव बावलगावे,व आदि संविधान प्रेमी व सामाजिक कार्यकर्ते,व पत्रकार बांधव यावेळी उपस्तीथ होते.मान्यवर व प्रमुख पाहून्याच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तद्नंतर प्रा.डॉ बलभीम वाघमारे,माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे,पाशाभाई पटेल यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्तावीक संविधान दुगाने यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.धम्मपाल जाधव केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा