मुख्य सामग्रीवर वगळा

महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघ बिलोली व तुकाराम सुर्यवंशी बहुउद्देशिय संस्था च्या संयुक्त विद्यमाने सभापती निवास प्रांगणात संविधान दिन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला

बिलोली : डी.टी.सुर्यवंशी


समस्त विश्वाला आदर्शवत व अनेक राष्ट्रांनी संदर्भ म्हणून स्विकृत अशा भारतीय संविधानाचा गौरव दिन म्हणून अधिकारी ; पत्रकार व संविधान प्रेमी नागरिकांच्या उपस्थितित पार पडला . डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस अथक परिश्रम करून संविधानरुपी शिल्प राष्ट्रास अर्पण केले . भारतात असणारी विविधता व विषमतेचा अभ्यास करून सुवर्णमध्य साधला .

न्याय स्वातंत्र्य समता व बंधुतेचा जागर करून मानवी दरी संपवणारी व प्रत्येक नागरिकाला प्रतिष्ठा व ओळख विधिवत उपलब्ध करणारे संविधान हे समस्त भारतीय जणांसाठी आदरणीय आहे . सदर ग्रंथराजाचा यथोचित सन्मान त्यात मिळालेल्या अधिकाराचे संगोपण व संवर्धन होणे हे या दिनाचे महत्व आहे .

कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधान ग्रंथाचे पुष्पपुजन करून करण्यात आले व संविधानाच्या उद्देशिकेचे प्रकटवाचन करण्यात आले . ह्यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मत मांडुन प्रबोधन केले .

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पोलिस निरिक्षक भगवान धबडगे नी भूषविले . कार्यक्रमास महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचे सुनिल कदम मारोती भदरगे मारोती भालेराव संजय जाधव डी टी सुर्यवंशी यादव लोकडे संजय पोवाडे प्रल्हाद वाघमारे व प्रा धम्मपाल जाधव मुन्ना पोवाडे अमजद चाऊस यांची प्रमुख उपस्थिती लाभली .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...
गुत्तेदार व बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात बिलोली तहसील समोर दुगाने चे  अमरण उपोषण सुरु. बिलोली प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत चालू असलेल्या बिलोली ते देगलूर दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे.मात्र हे काम पूर्णपणे बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे.याची कल्पना तीन महिन्यापूर्वी पासून उपोषणकर्ते  संविधान दुगाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला लेखी तक्रार देऊन रस्त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.मात्र या तक्रारी अर्जाला केराची टोपली दाखवत बांधकाम विभागाने संबधित गूत्तेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप दुगाणेनी केला आहे.      एकीकडे खड्डेमुक्त रस्ते  व अपघाताचे प्रमाण कमी करू पाहणाऱ्या महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना आगामी दोन वर्षासाठीे खड्डेमुक्त रस्ता हे अभियान राबवावे लागेल यात शंका नाही.कारण बिलोली- देगलूर हा राज्य महामार्ग असून हा रस्ता आंध्र,तेलंगण व कर्नाटक राज्यांना जोड़न...