बिलोली प्रतिनिधी
कांगठी - भारतीय घटनेचे महत्व व त्याचा जनजागर करत मौजे कांगठी येथे संविधान दिन साजरा करण्यात आला . संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचे पुष्पपुजन करून उद्देशिकेचे समुहवाचन करण्यात आले .
ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना पत्रकार गौतम वाघमारे म्हणाले की भारतीय घटना ही सर्व भारतीयीचा श्वास आहे जसे जगण्यासाठी श्वासाचे महत्व आहे तसेच घटनेचे भारतास महत्व आहे . घटनेचा अभ्यास आणि अनिवार्यता समजूनच आपण भारतीय नागरिक म्हणून ओळख निर्माण करू शकतो .
कार्यक्रमासाठी ग्राम पंचायत सदस्य शेषेराव वाघमारे विठ्ठल वाघमारे बाळाजी वाघमारे दत्ता संभाजी व अनेक विद्यार्थी तथा ग्रामस्थ उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा