मुख्य सामग्रीवर वगळा

खैरलांजी,रोहीत,आणि नितीन आगेच्या मारेकऱ्याना केंव्हा होणार फाशी-संविधान दुगाने


नांदेड प्रतिनिधी 
दीड वर्षापूर्वी घडलेल्या कोपर्डि बलात्कार प्रकरनातील आरोपीना फाशीची शिक्षा ठोटावण्यात आली मात्र बरीच वर्ष लोटुनही आजपर्यंत खैरलांजीतील पीड़ित भोतमांगे परिवाराला न्याय का मिळाला नाही?असा सवाल वारणेचा वाघ सामाजिक संघटनेच्या संविधान दुगाने यांनी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना दिलेल्या लेखी निवेदनामध्ये केला आहे.
       त्यात त्यांनी रोहित वेमूल्ला व नितीन आगे प्रकरणाचा ही प्रकर्षाने उल्लेख केला आहे.समता आणि न्याय भारतीय संविधानातील मूलभूत अधिकाराची पायमल्ली करत भारतीय न्याय व्यवस्थेत न्यायदानाची महत्वपूर्ण भूमिका बजावणारे शासकीय वकील जात पाहून केस लढवत असल्याचा घनाघाती आरोप दुगाने यांनी केला आहे.कारण खैरलांजी मध्ये एका स्त्रीच्या योनीमध्ये रॉड घालून तिच्यावर सामूहिक बलात्कार आळीपाळीने तेथील जातीय गाव गुंडानी केला.तिच्याच आईची गावभर नागडी धिंड काढली गेली.तिच्या सोबत तिच्याच भावाने बलात्कार करावा अशी धमकी भावाला दिली गेली.त्यांनी ही मागणी ऐकली नाही म्हणून त्याचे गुप्तांग कापले गेले होते.हे सगळं घडत असताना त्या गावातील महिला टाळ्या वाजवत होत्या.हल्लेखोराना चेतवीत होत्या.हे सगळं घडून गेल्यावर इथल्या व्यवस्थेला जाग आली तोपर्यंत 4 जीव गेले होते. आणि एक जिव वेडा झाला होता.पण एवढ्या गंभीर प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटले.दिल्लीतील निर्भया उर्फ प्रियंका बलात्कार प्रकरनातील आरोपीना सुद्धा फाशी झाली.आणि काल-परवा कोपर्डि बलात्कार प्रकरणातील आरोपीना सुध्दा फाशीची शिक्षा सुणावण्यात आली.त्यातच नितीन आगे केसचा निकाल लागला ज्याचा खून झाला त्याच्या खुनातील तेरा आरोपीना कोर्टाने सबळ पुराव्याअभावी सोडले.त्याला वर्गातून मारत नेल गेलेल सगळ्या गावाने पाहिल होत.त्याच्या गुप्तांगात गरम सळया घालून अमानुष पणे त्याची हत्या केली गेली.पण तरी त्याचे मारेकरी मोकाटच का?कोपर्डिच्या आरोपीना केवळ परिस्थितीजन्य पुरावा ह्या एकाच आधारावर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतांना फाशी होतेय.नितीन आगे प्रकरणातील साक्षीदार उलटले असतीलही पण परिस्थितीजन्य पुरावा तर नितीन आगेच्या बाजूने होता व आहे.मग नितीनला न्याय का मिळाला नाही ?असा सवाल निवेदनाच्या माध्यमातून संविधान दुगाने यांनी केला आहे.
  खैरलांजी ची केस ज्या वकिलांनी लढवली त्याच वकिलांनी कोपर्डिच्या भगिनीला न्याय मिळवून दिला.तर खैरलांजी पीड़ित स्त्री ही स्त्री न्हवती का?तर मग न्याय जात पाहून दिलाय का?समतेच्या जगमान्य तत्वाला उज्वल निकम सारखे वकील मानत नसून ज्या संविधानातील तत्वाला हे वकील मानत नाही.हा घटनेचा अवमान असून देशाच्या सर्वश्रेष्ठ ग्रंथाचा अवमान करणाऱ्या वकिलांना वकिली करण्याचा काहीच अधिकार नाही.
      सदरील,नितीन आगे,रोहीत वेमूल्ला व खैरलांजी प्रकरण भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकरांनी ही केस लढवून वरील पिडितांच्या कुटुंबाना न्याय मिळवून देण्याची संधी न्यायालयाने अँड.आंबेडकरांना द्यावी.आणि भारतीय घटनेचा अवमान करून न्याय दाणात भेद करणाऱ्या अँड उज्वल निकम यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले

* लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले*   * नांदेड :-  वैभव घाटे*  मेसचे बिल मंजूर करण्यासाठी गृहपाल किशोरी अलोने यांना २० हजाराची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. हदगाव येथील समाज कल्याण विभागाच्या मुलीच्या वसतिगृहात त्या कार्यरत असून याच ठिकाणी त्यांना पकडण्यात आले.     हदगाव येथे समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह आहे. येथे ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनी राहत असून किशोरी अलोने या गृहपाल आहेत. वसतिगृहात कार्यरत असलेल्या खानावळीचे बिल काढताना विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरावी भरावी लागते. हि बाब लक्षात घेऊन अलोने यांनी मेस चालकाची अडवणूक करत विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरण्यासाठी २० हजार रुपयाची मागणी केली. यानंतर मेस चालकाने याबाबत नांदेड एसीबी कडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करत आज सकाळी ११ वाजता नांदेड एसीबी ने शासकीय वसतिगृह परिसरात सापळा रचला. यावेळी अलोने या मेस चालकाकडून २० हजाराची लाच स्वीकारताना एसिबी च्या जाळ्यात अडकल्या.     याप्रकरणात हदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा सापळा पोलीस अधीक्षक संजय ला

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.  बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे  गेल्या अनेक दिवसांपासून बिलोली तहसिल कार्यालयातील कर्मचारी निवासी न राहता नांदेड सारख्या शहरात राहून येजा करीत असल्याने तहसिल कार्यालयाचे अनेक कामे वेळेत होत नसल्यामुळे जनतेची कामे खोळंबत असल्याने पत्रकार  संरक्षण समिती  बिलोली च्या वतिने विभागीय अधिकारी बिलोली यांना निवेदन देण्यात आले. बिलोली तहसिल कार्यालयाचे तहसिलदार विनोद गुंडमवार हे बिलोली तहसिल येथे रुजू झाल्यापासून आजतागायत तहसील कार्यालयात नांदेड येथून ये-जा करीत आहेत. याचेच अनुकरण नायब तहसीलदार हे देखील नांदेड येथून ये-जा करित असुन मुख्यालया राहत नसूनही शासनाकडून घरभाडे उचल करीत शासनाची दिशाभूल करीत आहेत याचाच अर्थ उंटावरुन शेळ्या हाकण्यासारखा कारभार सदरील तहसील कर्मच्यार्यांचा झाला आहे. यामुळे तालुक्यातील निराधार, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व बिलोली तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग उद्भवल्यास याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न तहसिलदार ये-जा करीत आसल्या कारणांमुळे अनेक कामे खोळंबत असल्याने जनतेची गैरसोय होत आहे.  बिलोली तालुक्यातील जनतेची गैरसोय दुर क

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध -------------------------------------------------------------  बिलोली     हिंगोली जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला.या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ ता.बिलोलीच्या वतीने जाहिर निषेध करून हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीचे निवेदन तहसिलदार बिलोली यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडे पाठवले आले.    हिंगोलीचे जेष्ठ पञकार व जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर दि.२३ आक्टोंबर रोजी अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक केला.हि घटना घडून ३ दिवस उलटले तरी पोलिसांना आरोपीस पकडण्यात अध्याप अश आले नाही.यामुळे तालुक्यातील पञकारांमध्ये संतापाची लाठ उसळली असून दिलेल्या निवेदनात आपल्या भावना प्रकट करून मा.मुख्यमंञी यांच्याकडे नायब तहसिलदार संजय नागमवाड यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.यावेळी पञकार संघाचे अध्यक्ष  राजेंद्र पा.शिंदे,संघाचे प्रमुख गोविंद मुंडकर,कार्याध्यक्ष बाबूराव इंगळे,उपाध्यक्ष