मुख्य सामग्रीवर वगळा

खैरलांजी,रोहीत,आणि नितीन आगेच्या मारेकऱ्याना केंव्हा होणार फाशी-संविधान दुगाने


नांदेड प्रतिनिधी 
दीड वर्षापूर्वी घडलेल्या कोपर्डि बलात्कार प्रकरनातील आरोपीना फाशीची शिक्षा ठोटावण्यात आली मात्र बरीच वर्ष लोटुनही आजपर्यंत खैरलांजीतील पीड़ित भोतमांगे परिवाराला न्याय का मिळाला नाही?असा सवाल वारणेचा वाघ सामाजिक संघटनेच्या संविधान दुगाने यांनी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना दिलेल्या लेखी निवेदनामध्ये केला आहे.
       त्यात त्यांनी रोहित वेमूल्ला व नितीन आगे प्रकरणाचा ही प्रकर्षाने उल्लेख केला आहे.समता आणि न्याय भारतीय संविधानातील मूलभूत अधिकाराची पायमल्ली करत भारतीय न्याय व्यवस्थेत न्यायदानाची महत्वपूर्ण भूमिका बजावणारे शासकीय वकील जात पाहून केस लढवत असल्याचा घनाघाती आरोप दुगाने यांनी केला आहे.कारण खैरलांजी मध्ये एका स्त्रीच्या योनीमध्ये रॉड घालून तिच्यावर सामूहिक बलात्कार आळीपाळीने तेथील जातीय गाव गुंडानी केला.तिच्याच आईची गावभर नागडी धिंड काढली गेली.तिच्या सोबत तिच्याच भावाने बलात्कार करावा अशी धमकी भावाला दिली गेली.त्यांनी ही मागणी ऐकली नाही म्हणून त्याचे गुप्तांग कापले गेले होते.हे सगळं घडत असताना त्या गावातील महिला टाळ्या वाजवत होत्या.हल्लेखोराना चेतवीत होत्या.हे सगळं घडून गेल्यावर इथल्या व्यवस्थेला जाग आली तोपर्यंत 4 जीव गेले होते. आणि एक जिव वेडा झाला होता.पण एवढ्या गंभीर प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटले.दिल्लीतील निर्भया उर्फ प्रियंका बलात्कार प्रकरनातील आरोपीना सुद्धा फाशी झाली.आणि काल-परवा कोपर्डि बलात्कार प्रकरणातील आरोपीना सुध्दा फाशीची शिक्षा सुणावण्यात आली.त्यातच नितीन आगे केसचा निकाल लागला ज्याचा खून झाला त्याच्या खुनातील तेरा आरोपीना कोर्टाने सबळ पुराव्याअभावी सोडले.त्याला वर्गातून मारत नेल गेलेल सगळ्या गावाने पाहिल होत.त्याच्या गुप्तांगात गरम सळया घालून अमानुष पणे त्याची हत्या केली गेली.पण तरी त्याचे मारेकरी मोकाटच का?कोपर्डिच्या आरोपीना केवळ परिस्थितीजन्य पुरावा ह्या एकाच आधारावर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतांना फाशी होतेय.नितीन आगे प्रकरणातील साक्षीदार उलटले असतीलही पण परिस्थितीजन्य पुरावा तर नितीन आगेच्या बाजूने होता व आहे.मग नितीनला न्याय का मिळाला नाही ?असा सवाल निवेदनाच्या माध्यमातून संविधान दुगाने यांनी केला आहे.
  खैरलांजी ची केस ज्या वकिलांनी लढवली त्याच वकिलांनी कोपर्डिच्या भगिनीला न्याय मिळवून दिला.तर खैरलांजी पीड़ित स्त्री ही स्त्री न्हवती का?तर मग न्याय जात पाहून दिलाय का?समतेच्या जगमान्य तत्वाला उज्वल निकम सारखे वकील मानत नसून ज्या संविधानातील तत्वाला हे वकील मानत नाही.हा घटनेचा अवमान असून देशाच्या सर्वश्रेष्ठ ग्रंथाचा अवमान करणाऱ्या वकिलांना वकिली करण्याचा काहीच अधिकार नाही.
      सदरील,नितीन आगे,रोहीत वेमूल्ला व खैरलांजी प्रकरण भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकरांनी ही केस लढवून वरील पिडितांच्या कुटुंबाना न्याय मिळवून देण्याची संधी न्यायालयाने अँड.आंबेडकरांना द्यावी.आणि भारतीय घटनेचा अवमान करून न्याय दाणात भेद करणाऱ्या अँड उज्वल निकम यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल *पहिल्याच टप्प्यात पाच एकर जमीन ताब्यात* बिलोली-  (शिवराज भायनुरे )  बिलोली तालुक्यात नावलौकिक असलेल्या सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून वन विभागाने गुन्हा दाखल करून 5 एकर जमीन ताब्यात घेतली आहे वन विभागाच्या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे संस्कृती संवर्धन मंडळाकडून वन अधिकार्‍यांवर राज्य पातळीवरील तबाव टाकण्याचा प्रकार चालू असल्याची माहिती समोर येत आहे बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील सर्वे नंबर 530 मध्ये वन विभागाची जवळपास 171 हेक्टर जमीन असल्याची माहिती आहे वन विभागाच्या जवळपास 15 एकर जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचे स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत संस्कृती संवर्धन शिक्षण मंडळाने येथील वन विभागाच्या जमीनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष शंकर महाजन यांनी लेखी तक्रारीद्वारे वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती एकीकडे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' चा नारा देत ...