मुख्य सामग्रीवर वगळा

सगरोळी फाटा ते टाकळी फाटा रस्त्यावरील खड्डे* बुजविण्याचे काम निकृष्ठ.



नांदेड - वैभव घाटे

रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे आदेश शासनाने जाहीर करताच सगरोळी फटा ते टाकळी फाटा देगलुर रोड वरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले आहे. सद्या रस्त्यावरील खड्ड्याचा प्रश्न चर्चीला जात आहे.राज्यमार्ग व जिल्हा मार्ग व अन्य रस्त्याची दैनीय आवस्था झाल्याच्या तक्ररी मोठया प्रमानात केल्या गेल्या होत्या. खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या बाबीचे गांभिर्याने घेत शासनाने 15 डिसेंबर पर्यंत रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले. सगरोळी फटा हा तेलंगाणा व महाराष्ट राज्याला जोडनारा रस्ता आगदी सिमे लगद असुन तो देगलुर मार्ग कर्नाटक , बिदर कडे जणारा राज्य क्रंमाकाचा रस्ता असुन खड्डे बुजविण्याचे काम मोठ्या प्रमानात सुरु आहे. मात्र हे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे करण्यात येत असल्याने या कामाकडे वरिष्ठानी लक्ष देउन रस्त्याचे काम दर्जेदार करावे अशी मागणी सगरोळी परिसरातील जनतेतुन होत आहे. या रस्त्याच्या  अनेकदा संबधिताचे लक्ष वेधले आहे. परिणामी रानवळकरानी या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. काम चांगले करुन घेन्यात त्यांचा हात खंड असतानही आज हे काम अत्यंत निकृष्ठ प्रतीचे होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. हे काम एका राजकिय व्यक्तिने घेउन ते या भागातिल छोटे मोठे गुत्तेदारांना हताशी घेउन पुर्ण करुन घेत असल्याचे समजते या लहान गुत्तेदारांन कामाचा अनुभव नसल्याने खड्ड्यात गिट्टी व डांबराचे प्रमाण अत्यंत कमी वापरत आहेत. तसेच अगोदर रस्त्यातील धुळ योग्य पधतीने काढण्यात आली नाही. परिणामी कांही दिवसात हे खड्डे जैसे-थे होणार आहेत. या निकृष्ठ कामावर सार्वजनीक बांधकाम अधिकारि तथा लोक प्रतीनीधिंनी जातिंने लक्ष देऊन सगरोळी फटा ते टाकळी फाटा पर्यंत होनारा रस्ता चांगल्या प्रतिचा व दर्जेदार करावा अशी मागणी सगरोळी परीसरातिल जनतेतुन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल *पहिल्याच टप्प्यात पाच एकर जमीन ताब्यात* बिलोली-  (शिवराज भायनुरे )  बिलोली तालुक्यात नावलौकिक असलेल्या सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून वन विभागाने गुन्हा दाखल करून 5 एकर जमीन ताब्यात घेतली आहे वन विभागाच्या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे संस्कृती संवर्धन मंडळाकडून वन अधिकार्‍यांवर राज्य पातळीवरील तबाव टाकण्याचा प्रकार चालू असल्याची माहिती समोर येत आहे बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील सर्वे नंबर 530 मध्ये वन विभागाची जवळपास 171 हेक्टर जमीन असल्याची माहिती आहे वन विभागाच्या जवळपास 15 एकर जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचे स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत संस्कृती संवर्धन शिक्षण मंडळाने येथील वन विभागाच्या जमीनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष शंकर महाजन यांनी लेखी तक्रारीद्वारे वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती एकीकडे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' चा नारा देत ...